शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

मणिपूरसह नॉर्थ-ईस्टमधील अतिरेक्यांना हत्यारे कुठून मिळताहेत? गुप्तचर यंत्रणांकडून मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 12:20 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये अशांतता माजणवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्यासाठी सीमेपलीकडून कट रचला जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य भीषण दंगलीमध्ये होरपळत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये अशांतता माजणवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्यासाठी सीमेपलीकडून कट रचला जात आहे. याबाबत झी न्यूजच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मणिपूरसह ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना मोठ्या प्रमाणावर चिनी हत्यारे पुरवली जात आहेत. चीनमध्य तयार झालेल्या या हत्यारांचा वापर हा मणिपूरमध्ये हिंसाचार माजवण्यासाठी केला जात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारासाठी ज्या हत्यारांचा वापर केला जात आहे, त्यामधील अनेक हत्यारे ही चीनमध्ये बनवलेली आहेत. म्यानमार आणि चीनच्या सीमेवर असलेल्या ब्लॅक मार्केटमधून ही हत्यारे म्यानमारच्या सीमेमध्ये आणण्यात येत आहेत. तिथून ही हत्यारे मणिपूरमध्ये पाठवण्याचा कट आखला जात असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.

मणिपूरसह ईशान्य भारतात हिंसाचार माजवण्यासाठी अतिरेकी गटांकडून वापरण्यात येत असलेल्या चीनी हत्यारांबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेक्यांकडे ज्या प्रकारे चिनी हत्यारे पोहोचत आहेत, ती चिंतेची बाब आहे, असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मणिपूरमध्येही अतिरेकी समुहांकडून याच हत्यारांच्या मदतीने हिंसाचार माजवण्यात येत आहे. अतिरेक्यांचे अनेक कमांडर हे चीनमध्ये लपून असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या मते मणिपूरमधील हिंसाचारामध्ये ज्या चिनी हत्यारांचा वापर अतिरेकी गटांकडून केला जात आहे, त्यामध्ये चिनी पिस्तुलांपासून ते असॉल्ट रायफलपर्यंतच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारत आणि म्यानमारमध्ये असलेल्या खुल्या सीमेमधून हत्यारे भारतीय हद्दीत मणिपूरमध्ये पाठवण्याचा कट आखत असल्याची गुप्तचर यंत्रणांना शंका आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी सीमेवर आसाम रायफल्सला अलर्ट करण्यात आले आहे. तसेच भारत आणि म्यानमारमधील खुल्या सीमारेषेवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndiaभारतchinaचीन