शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

मणिपूरसह नॉर्थ-ईस्टमधील अतिरेक्यांना हत्यारे कुठून मिळताहेत? गुप्तचर यंत्रणांकडून मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 12:20 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये अशांतता माजणवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्यासाठी सीमेपलीकडून कट रचला जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य भीषण दंगलीमध्ये होरपळत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये अशांतता माजणवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्यासाठी सीमेपलीकडून कट रचला जात आहे. याबाबत झी न्यूजच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मणिपूरसह ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना मोठ्या प्रमाणावर चिनी हत्यारे पुरवली जात आहेत. चीनमध्य तयार झालेल्या या हत्यारांचा वापर हा मणिपूरमध्ये हिंसाचार माजवण्यासाठी केला जात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारासाठी ज्या हत्यारांचा वापर केला जात आहे, त्यामधील अनेक हत्यारे ही चीनमध्ये बनवलेली आहेत. म्यानमार आणि चीनच्या सीमेवर असलेल्या ब्लॅक मार्केटमधून ही हत्यारे म्यानमारच्या सीमेमध्ये आणण्यात येत आहेत. तिथून ही हत्यारे मणिपूरमध्ये पाठवण्याचा कट आखला जात असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.

मणिपूरसह ईशान्य भारतात हिंसाचार माजवण्यासाठी अतिरेकी गटांकडून वापरण्यात येत असलेल्या चीनी हत्यारांबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेक्यांकडे ज्या प्रकारे चिनी हत्यारे पोहोचत आहेत, ती चिंतेची बाब आहे, असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मणिपूरमध्येही अतिरेकी समुहांकडून याच हत्यारांच्या मदतीने हिंसाचार माजवण्यात येत आहे. अतिरेक्यांचे अनेक कमांडर हे चीनमध्ये लपून असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या मते मणिपूरमधील हिंसाचारामध्ये ज्या चिनी हत्यारांचा वापर अतिरेकी गटांकडून केला जात आहे, त्यामध्ये चिनी पिस्तुलांपासून ते असॉल्ट रायफलपर्यंतच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारत आणि म्यानमारमध्ये असलेल्या खुल्या सीमेमधून हत्यारे भारतीय हद्दीत मणिपूरमध्ये पाठवण्याचा कट आखत असल्याची गुप्तचर यंत्रणांना शंका आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी सीमेवर आसाम रायफल्सला अलर्ट करण्यात आले आहे. तसेच भारत आणि म्यानमारमधील खुल्या सीमारेषेवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndiaभारतchinaचीन