शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:16 IST

Amit Shah Reaction On Indus Water Treaty : "आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले..."

भारताने सिंधू पाणी करार कायमचा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार आता पु्न्हा पूर्ववत होणे नाही. पाकिस्तानने या कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे. यामुळे आता त्याला पूर्वी जे पाणी मिळत होते, ते मिळणार नाही. असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिंद्धू पाणी करारासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले, "हा करार आता कधीही पूर्ववत होणार नाही. आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले. हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्या शांतीच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने करण्यात आला होता. मात्र, याच्या अटीच मोडल्या गेल्या, यामुळे याचे औचित्य संपले.

पहलगाम दहशतवादी हल्लायनंतर घेण्यात आली अ‍ॅक्शन - गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे भारतात प्रचंड संतापाची आणि दुःखाची लाट होती. चानंतर लगेचच भारताने सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यासारखे अनेक राजकीय निर्णयही घेतले होते.पहलगाम हल्ल्याचा निषेध करत काय म्हणाले अमित शाह? -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्याचा निषेध करत म्हणाले, काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे आणि तरुणांची दिशाभूल करण्याचे हे षड्यंत्र होते. पहलगाम हल्ला काश्मीरमधील वाढते पर्यटन थांबवण्यासाठी आणि तरुणांना विकासाच्या मार्गावरून भरकटवण्यासाठी जाणूनबुजून करण्यात आला होता. मात्र, खोऱ्यातील लोक आता पूर्वीच्या तुलनेत भारतासोबत उभे आहेत," असेही शाह म्हणाले.   

टॅग्स :Amit Shahअमित शाहPakistanपाकिस्तानWaterपाणीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर