शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

काश्मीरमध्ये काय होणार? कुणीच सांगत नाही; महेबुबा मुफ्तींनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 3:46 PM

काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीतील वाढत्या हालचालींमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीतील वाढत्या हालचालींमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये काय होणार आहे, याची माहिती कुणीही देत नाही आहे, असे त्या म्हणाल्या.

काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना महेबुबा मुफ्ती यांनी सांगितले की, "काश्मीरवर संकट कोसळले आहे. इथे काय होणार आहे याची माहिती कुणीही सांगत नाही आहे. दरम्यान, मी रविवारी एका हॉटेलमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र पोलिसांनी त्या हॉटेलचे बुकिंग रद्द केले," असा आरोप त्यांनी केला.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली तैनाती आणि एकापाठोपाठ एक सूचना जारी होत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 आणि कलम 35 (अ) हटवण्याची तयारी सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय जम्मू -काश्मीरचे जम्मू, काश्मीर आणि लडाख असे त्रिभाजन करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, काश्मीर खो-यात प्रचंड प्रमाणात सशस्त्र पोलीस पाठविण्यात आल्यामुळे तिथे तणाव वाढला असून, काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या भीतीने भाजीपाला, अन्नधान्य, तसेच पेट्रोल खरेदीसाठी शनिवारी प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आणि बँका व एटीएममधून पैसे काढण्यासाठीही लोकांनी गर्दी केली. इतके सशस्त्र पोलीस कशासाठी आणले, हे केंद्र सरकार वा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट न केल्याने तिथे गोंधळाचे वातावरण आहे. लोकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा, असे राज्यपालांनी म्हटले आहे.

२५0 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

पाकिस्तानच्या सीमेवरील विविध लाँच पॅडवर सध्या २00 ते २५0 दहशतवादी सज्ज आहेत आणि ते काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत, असे लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत गेले, तेव्हा या सर्व दहशतवाद्यांनी सीमेवरून हटविण्यात आले होते. इम्रान खान परतताच अतिरेकी पुन्हा लाँच पॅडवर आले आहेत, असे या अधिका-याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीAmit Shahअमित शहाAjit Dovalअजित डोवाल