शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

'इमरान खान आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय शिजतंय? निवडणुकीपूर्वी हल्ला का घडवला?'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:12 PM

पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.  पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या कॅम्पवर आयएसआयला मोदींनीच हल्ला करुन दिला. पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दक्षिण गोवा येथे आपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. 

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या नक्की काय शिजतंय? हे काही समजत नाही. निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काही दिवसांपूर्वी परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इमरान खान यांच्या विधानाचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शंका उपस्थित केली.

इतकचं नाही तर केजरीवाल असंही म्हणाले की, चार आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता इमरान खान नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून बघण्याची इच्छा व्यक्त करतात. ते असं का करत आहेत? आता लोकांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारणे सुरु केले आहे. इमरान खान यांनी लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर पुलवामा हल्ला का घडवून आणला? असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. 

तसेच पाकिस्तानला नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआयला चौकशीसाठी निमंत्रित केलं मात्र आयएसआय ही गुप्तचर यंत्रणेपेक्षा दहशतवाद्यांची यंत्रणा जास्त वाटते असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019south-goa-pcदक्षिण गोवा