शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बिहारमध्ये नेमकं घडतंय काय?; काँग्रेसचे १० आमदार भाजपच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 18:10 IST

त्य़ातच, आता काँग्रेसचेही १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. 

एकीकडे इंडिया आघाडीतून लोकसभेसाठी बाहेर असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने केली आहे. त्यामुळे, इंडिया आघाडी बनण्यापूर्वीच बिघडताना दिसून येत आहे. त्यातच, बिहारमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पुन्हा एकदा भाजपासोबत संसार थाटणार असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय समिकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्य़ातच, आता काँग्रेसचेही १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. 

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवटचा अंक लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता असून जेडीयू-आरजेडी महाआघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होणार असून याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं समजते. नितीश कुमार यांच्या एनडीए प्रवेशात सध्या बिहारमध्ये सत्तेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची कोंडी होईल. त्यामुळे, लालू प्रसाद यादवही ऐनवेळी अनोखा डाव टाकत भाजप आणि जेडीयूला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पण, आता काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे समजते.

बिहार भाजपचे प्रमुख सम्राट चौधरी यांची सुशील कुमार मोदी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासमवेत दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये, गृहमंत्री अमित शहांसोबत ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही समजते. दुसरीकडे काँग्रेसमधील १० आमदारही भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे, लवकरच बिहारमध्ये राजकीय सत्तांतराचे नाट्य पाहायला मिळू शकते. बिहारमध्ये काँग्रेसकडे १९ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी, १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.

लालू प्रसाद यादवही डाकणार डाव? 

पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

भाजपात दोन गट

दरम्यान, नितीश कुमारांच्या जेडीयूने भाजपसोबत जाण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. नितीश कुमारांना मुख्यमंत्री दिलं तर आपल्या हक्काच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यातूनच नितीश कुमारांच्या एनडीएतील घरवापसीची घोषणा रखडली आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाAmit Shahअमित शाह