शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्हॉट अ‍ॅन आयडिया गुरुजी... कोरोनातही कल्पकतेतून भरली 200 विद्यार्थ्यांची शाळा

By महेश गलांडे | Updated: October 6, 2020 08:55 IST

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगीदेखील सर्वात महत्वाची मानली गेली आहे

ठळक मुद्देहर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो शेअर करत, या शाळेचं कौतुक केलंय. त्यामुळेच, व्हॉट अॅन आयडिया गुरूजी ... असंच म्हणून या शाळेचं आणि शिक्षकांचं कौतुक करावं लागेल.  

रांची - केंद्रीय गृह मंत्रालयाने पाचव्या टप्प्यात ५.० अनलॉक प्रक्रियेसंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानंतर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थानसह विविध राज्यांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना केली आहेत. त्यानुसार, शाळा सुरू करण्यासाठी अनेक राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, झारखंडमधील एका शाळेनं लढवलेली शक्कल पाहून, व्हॉट अॅन आयडिया गुरुजी... असंच म्हणावं लागेल.  

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगीदेखील सर्वात महत्वाची मानली गेली आहे. याशिवाय, शाळा पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवतील. एवढेच नाही तर केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय राज्य सरकार आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारीनुसार घेईल. तसेच, राज्य सरकार  कोरोना संसर्गाच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेईल. त्यांच्यावर कोणताही दबाव नसणार आहे. त्यामुळे, शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्यापही खात्रीशीर निर्णय होत नाही. 

झारखंडमधील एका शाळेत गुरुजींनी लढवलेली शक्कल पाहून सर्वांनाच कौतुक वाटतंय. कारण, विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करुन या शाळेत धडे दिले जात आहेत. नेहमीच वर्गात भरणारी शाळा, कोरोनामुळे वर्गाबाहेर भरविण्यात आली असून बाहेरील भींतीवरच फळा बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा फळा असून सोशल डिस्टन्स पाळून हा अभ्यासवर्ग सुरू आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विचार आणि आवाज ऐकू येण्यासाठी लाऊड स्पीकरची सोयही करण्यात आली आहे. या शाळेत 200 विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकविण्यात येत आहे. अतुल्य भारतातील हा अमेझिंग शोध असल्याचं उद्योगपती हर्ष गोएंका यांनी म्हटलंय. 

हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो शेअर करत, या शाळेचं कौतुक केलंय. त्यामुळेच, व्हॉट अॅन आयडिया गुरूजी ... असंच म्हणून या शाळेचं आणि शिक्षकांचं कौतुक करावं लागेल.  

शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा गोंधळ कायम

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, राज्य शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. यूजीसीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत दोन वेळा मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानुसार राज्य शासनाने व विद्यापीठाने ऑगस्ट-सप्टेंबरपासून संलग्न महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग सुरु करण्याबाबत कळविले. मात्र, यूजीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Jharkhandझारखंडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाTwitterट्विटर