शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

जे आज काश्मिरींंसोबत घडतंय ते उद्या आपल्याबरोबरही घडणार; अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 3:33 PM

कलम 370 हटविल्यानंतर काश्मिरी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला का?

लखनऊ - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर विरोधकांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी कलम 370 हटविण्यावर केंद्र सरकारला अप्रत्यक्ष समर्थन देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. आज जे काश्मिरी लोकांसोबत घडतंय ते उद्या आपल्यासोबतही घडेल असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला आहे.

लखनऊमध्ये अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये कलम 370 हटविण्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांना उत्तर दिले. आज 20 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत लोकांना त्यांच्या घरात कैद केलं आहे. सरकारने जर इतका धाडसी निर्णय घेतला तर त्यापूर्वी लोकांना विचारात का घेतलं नाही? नक्की काश्मीरात काय चाललंय याची माहिती पत्रकारांनी द्यावी. कलम 370 हटविणे भाजपाच्या जाहिरनाम्यात होतं. कलम 370 हटविल्यानंतर काश्मिरी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला का? जे आज काश्मिरी लोकांसोबत घडत आहे ते भविष्यात आपल्यासोबतही घडू शकेल असं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

अनेक सरकारी एजन्सीना हाताशी धरून दहशत पसरविण्याचं काम केलं जात आहे. सरकारी संस्थांचा गैरवापर करणे भाजपाकडून शिकलं पाहिजे. लोकशाहीची नवीन परिभाषा ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सपासून तयार केली जात आहे. या संस्थांचा वापर करून भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांना धमकाविण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

तसेच देशाची आणि राज्याची परिस्थिती नाजूक आहे. शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. यूपीत कोणतीही मोठी गुंतवणूक झाली नाही. 70 लाख रोजगार निर्माण केले जातील त्या दाव्याचं झालं काय? बांग्लादेशातील पैशाची किंमत भारतापेक्षा अधिक झाली आहे असंही अखिलेश यादव यांनी सांगितले. यावेळी अखिलेश यादव यांनी दिल्लीतील समाजवादी पक्षाची कार्यकारणी बरखास्त केली. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी