शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 8:58 AM

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. सामान्य जनतेचे नुकसान न करता दहशतवाद्यांना टार्गेट करायचं हे लक्ष्य करायचं आमचं ठरलं. त्यादृष्टीने सगळं नियोजन करण्यात आलं. या सर्व प्रक्रियेत मी बारकाईने लक्ष देत होतो. मला माहीत होतं रात्री 1 वाजता वायूदलाचे जवान पाकिस्तानात घुसणार आहेत. माझे जवान आपला जीव धोक्यात घालून स्ट्राईक करुन पुन्हा येईपर्यंत मला झोप नव्हती अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदी यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मी कधीही राजकीय विचार करुन निर्णय घेतले नाहीत. ज्या रात्री बालकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात येणार होतं. तेव्हा मी त्यावर लक्ष ठेवून होतो. जवान किती वाजता निघणार? किती वाजता हल्ला होणार? हे सगळं मला माहीत होतं. जवानांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर पहाटे 4 वाजता मला फोन आला, काम फत्ते झालं आपले जवान सुखरुप परत आले तेव्हा मी सुटकेचे निश्वास सोडला असं मोदी यांनी सांगितले. 

त्यानंतर मी सोशल मिडीयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे काही हालचाल झालीय का हे पाहत होतो. 5 पर्यंत काहीच झालं नव्हतं. कुठे बातमी नव्हती मात्र साडेपाच सुमारास पाकिस्तानमधील एकाने ट्विट केलं त्यानंतर ही घटना समोर आली. आम्ही कोणालाच काही बोललो नाही. त्यानंतर मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करुन बैठक बोलवली होती. सकाळी 7 वाजता पुढील नियोजनासाठी माझ्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली असही मोदींनी सांगितले. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट परिसरात दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं.  एअर स्ट्राईकचं पुरावा सगळ्यात आधी पाकिस्तानच्या लोकांनीच दिला. किती मारले किंवा नाही हा संशय इथल्या लोकांना आहे. दहशतवादी मारल्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली. नेमकं भारताने काय केलं हे सांगण्यासाठी पाकिस्तानला उघडपणे जगाला सांगता येणार नाही. माझं काम भारताच्या हिताचे रक्षण करणं आहे. आपलेचे नेते पुरावा मागत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीindian air forceभारतीय हवाई दल