शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत

ठळक मुद्देगलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झालीचीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाहीआपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, भारताचे वीर जवानांच्या हौताम्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली असून चीनचा बदला देण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी चीनविरोधात सरकार आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत, त्यामुळे निश्चितच सरकारच्या मनात काहीतरी विचार सुरु आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत राम माधव म्हणाले, आपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे त्यामुळे निश्चितच ते व्यर्थ जाणार नाही. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला तो नरसंहार आहे. चीनच्या या करकुतीचा प्रत्येक पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारुन निषेध केला आहे.

तसेच भारतीय जवानांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपलं बलिदान दिलं आहे. भारतीय सैनिकांनी चीनला आपल्या हद्दीत घुसण्यापासून रोखलं आहे. चीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाही. चीनचे सैन्य पुढे येत असताना आपल्या सैनिकांनी त्यांना रोखलं आहे. करारानुसार हत्याराचा वापर करता येत नाही. आम्हाला शांतता हवी पण देशाच्या सन्मानासाठी नेहमीच सतर्कतेसोबत उभे आहोत. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांना मागे हटण्यास भारतीय सैन्यांनी मजबूर केले आहे असं राम माधव म्हणाले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे कर्नलसह २० जवान शहीद झाले. या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला होता. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारताला शांतता हवी पण कोणीही असा भ्रम ठेवू नये, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. वीरता आमच्या देशाच्या चरित्र्याचा भाग आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला उत्तर दिलं होतं. दरम्यान नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

टॅग्स :IndiaभारतchinaचीनBJPभाजपा