शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत

ठळक मुद्देगलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झालीचीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाहीआपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, भारताचे वीर जवानांच्या हौताम्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली असून चीनचा बदला देण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी चीनविरोधात सरकार आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत, त्यामुळे निश्चितच सरकारच्या मनात काहीतरी विचार सुरु आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत राम माधव म्हणाले, आपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे त्यामुळे निश्चितच ते व्यर्थ जाणार नाही. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला तो नरसंहार आहे. चीनच्या या करकुतीचा प्रत्येक पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारुन निषेध केला आहे.

तसेच भारतीय जवानांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपलं बलिदान दिलं आहे. भारतीय सैनिकांनी चीनला आपल्या हद्दीत घुसण्यापासून रोखलं आहे. चीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाही. चीनचे सैन्य पुढे येत असताना आपल्या सैनिकांनी त्यांना रोखलं आहे. करारानुसार हत्याराचा वापर करता येत नाही. आम्हाला शांतता हवी पण देशाच्या सन्मानासाठी नेहमीच सतर्कतेसोबत उभे आहोत. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांना मागे हटण्यास भारतीय सैन्यांनी मजबूर केले आहे असं राम माधव म्हणाले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे कर्नलसह २० जवान शहीद झाले. या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला होता. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारताला शांतता हवी पण कोणीही असा भ्रम ठेवू नये, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. वीरता आमच्या देशाच्या चरित्र्याचा भाग आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला उत्तर दिलं होतं. दरम्यान नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

टॅग्स :IndiaभारतchinaचीनBJPभाजपा