शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत

ठळक मुद्देगलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झालीचीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाहीआपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, भारताचे वीर जवानांच्या हौताम्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली असून चीनचा बदला देण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी चीनविरोधात सरकार आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत, त्यामुळे निश्चितच सरकारच्या मनात काहीतरी विचार सुरु आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत राम माधव म्हणाले, आपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे त्यामुळे निश्चितच ते व्यर्थ जाणार नाही. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला तो नरसंहार आहे. चीनच्या या करकुतीचा प्रत्येक पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारुन निषेध केला आहे.

तसेच भारतीय जवानांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपलं बलिदान दिलं आहे. भारतीय सैनिकांनी चीनला आपल्या हद्दीत घुसण्यापासून रोखलं आहे. चीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाही. चीनचे सैन्य पुढे येत असताना आपल्या सैनिकांनी त्यांना रोखलं आहे. करारानुसार हत्याराचा वापर करता येत नाही. आम्हाला शांतता हवी पण देशाच्या सन्मानासाठी नेहमीच सतर्कतेसोबत उभे आहोत. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांना मागे हटण्यास भारतीय सैन्यांनी मजबूर केले आहे असं राम माधव म्हणाले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे कर्नलसह २० जवान शहीद झाले. या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला होता. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारताला शांतता हवी पण कोणीही असा भ्रम ठेवू नये, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. वीरता आमच्या देशाच्या चरित्र्याचा भाग आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला उत्तर दिलं होतं. दरम्यान नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

टॅग्स :IndiaभारतchinaचीनBJPभाजपा