शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत

ठळक मुद्देगलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झालीचीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाहीआपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, भारताचे वीर जवानांच्या हौताम्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली असून चीनचा बदला देण्याची मागणी देशवासियांकडून केली जात आहे. याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी चीनविरोधात सरकार आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं बोलले आहेत, त्यामुळे निश्चितच सरकारच्या मनात काहीतरी विचार सुरु आहे. एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत राम माधव म्हणाले, आपल्याला सरकारच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहावी लागणार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे त्यामुळे निश्चितच ते व्यर्थ जाणार नाही. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला तो नरसंहार आहे. चीनच्या या करकुतीचा प्रत्येक पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारुन निषेध केला आहे.

तसेच भारतीय जवानांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपलं बलिदान दिलं आहे. भारतीय सैनिकांनी चीनला आपल्या हद्दीत घुसण्यापासून रोखलं आहे. चीन भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करु शकणार नाही. चीनचे सैन्य पुढे येत असताना आपल्या सैनिकांनी त्यांना रोखलं आहे. करारानुसार हत्याराचा वापर करता येत नाही. आम्हाला शांतता हवी पण देशाच्या सन्मानासाठी नेहमीच सतर्कतेसोबत उभे आहोत. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांना मागे हटण्यास भारतीय सैन्यांनी मजबूर केले आहे असं राम माधव म्हणाले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे कर्नलसह २० जवान शहीद झाले. या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला होता. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारताला शांतता हवी पण कोणीही असा भ्रम ठेवू नये, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. वीरता आमच्या देशाच्या चरित्र्याचा भाग आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला उत्तर दिलं होतं. दरम्यान नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

टॅग्स :IndiaभारतchinaचीनBJPभाजपा