शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पश्चिम बंगालला कचरा व्यवस्थापनात अपयश; न्यायाधीकरणाने ठोठावला ३५०० कोटी रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:18 IST

उल्लंघन चालू राहिल्यास, अतिरिक्त भरपाई लादण्याचा विचार करावा लागेल.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने पश्चिम बंगाल राज्याला ३५०० कोटी रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. घन तसेच द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे होत असलेल्या पर्यावरणीय नुकसानीची भरपाई म्हणून हा दंड राज्याने दोन महिन्यांच्या आत स्वतंत्र  खात्यात जमा करायचा आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि घनकचरा प्रक्रिया प्रतिबंधित करणे अशा उपायांसाठी व   पर्यावरण शु्द्धीसाठी हा निधी वापरला जाईल.

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने एनजीटीला विविध प्रकरणांचे हस्तांतरण करताना पश्चिम बंगाल राज्यासंबंधी घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर, एनजीटीने सहा महिन्यांत तीन महानगर, ३ शहरे आणि ३ गावांत पर्यावरणपूरक  उपाय योजना कराव्यात आणि उर्वरित राज्यांत  एक वर्षात  कराव्यात, असे निर्देशित केले होते. मात्र, राज्याने आपले निर्देश गांभीर्याने घेतले नसल्याचे मत नोंदवत खंडपीठाने प्रगतीबाबत नाराजी व्यक्त केली.  न्यायाधीकरणाने या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करण्यासाठी सहामाही प्रगती अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.

एनजीटीची निरीक्षणे१. उल्लंघन चालू राहिल्यास, अतिरिक्त भरपाई लादण्याचा विचार करावा लागेल.२. तीन वर्षांनंतरही  पर्यावरणपूरक  उपाय योजनांची पुरेशी पूर्तता झालेली नाही आणि नजीकच्या भविष्यातही तशी होण्याची शक्यता दिसत नाही.३. कोणावरही जबाबदारी  निश्चित केलेली नाही, कोणतेही लेखापरीक्षण आयोजित केले गेलेले नाही. ४. दोषी अधिकाऱ्यांच्या एसीआरमध्ये कोणत्याही नोंदी केल्या नाहीत.- आदर्श कुमार गोयल, अध्यक्ष राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालpollutionप्रदूषण