शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

पश्चिम बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल; यशवंत सिन्हांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 13:55 IST

west bengal assembly election 2021: भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांची भाजपवर टीकाभाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल - सिन्हाअमित शाहांनी २०० जागा जिंकणार असल्याचा केला होता दावा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात भरघोस मतदानाची नोंद करण्यात आली. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. यातच अलीकडेच भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. बंगाल निवडणुकीत भाजपला २०० जागा मिळतील, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, बंगाल निवडणुकीत भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 yashwant sinha says that as per my information bjp to be win a total of 300 seats out of 294) 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. यावरून यशवंत सिन्हा यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल

बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने ३० पैकी फक्त २६ जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे, याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. माझ्या माहितीप्रमाणे भाजप संपूर्ण ३० आणि २९४ पैकी ३०० जागांवर विजय मिळवेल, अशी उपरोधिक टीका करणारे एक ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले आहे. 

राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान

भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल

भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामे करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला. 

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी ७९.७९ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालसह आसाम विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्पातील मतदान शनिवारी पार पडले. आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७७ टक्के मतदान झाले.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Yashwant Sinhaयशवंत सिन्हाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणAmit Shahअमित शहा