शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:03 IST

19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवानंतर, आता राजकीय वातावरणही तापले आहे. राजस्थानातील एका निवडणूक कार्यक्रमात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पीएम चा अर्थ 'पनौती मोदी' असल्याचे म्हटले होते. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निशाणा साधला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता अथवा मुंबईत खेळवला गेला असता तर भारत जिंकला असता, असे त्यांनी म्हटले आहे. 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर... -यावेळी ममता बॅनर्जी यांनी भगव्या जर्सीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर त्याचा परिणामही दिसून आला. यामुळे, भारतीय संघालाय भगव्या रंगाची जर्सी घालावी लागली नाही. भाजप प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून बघते आणि त्याचा  नकारात्मक परिणामही  दिसून येतो.  

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी सराव सत्रादरम्यान भारतीय संघाने परिधान केलेल्या जर्सीवरून प्रश्न उपस्थित केला होता. खेळाडूंनी भगव्या रंगाची जर्सी का परिधान केली, हे समजण्या पलिकडे आहे. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. एवढेच नाही, तर भाजपच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करायचे आहे, असेही ममता यांनी म्हटले होते.

आणखी तीन महिने राहणार हे सरकार - हे सरकार आणखी तीन महिने केंद्रात राहील, असे म्हणत, गोवंश तस्करीचा मुद्दाही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. बांगलादेशात तस्करीसाठी वेगवेगळ्या राज्यांतून गायी आणल्या जातात. प्रश्न असा आहे की, तेथे "पैसे" कोण घेते? देशातील बँकिंग क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे, सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) विकले जात आहेत. कोलकात्याच्या 'सिलिकॉन व्हॅली' प्रकल्पात सर्व मोठ्या आयटी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. खरे तर, धोकादायक वाटणाऱ्या सर्व लोकांना बदनाम करण्याची भाजपला सवय झाली आहे. केवळ मोठ-मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही. एकीकडे भाजप आपल्या यशाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे जनतेला जमिनीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारला याची कसलीही काळजी नाही, असेही ममतांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी