शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:03 IST

19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवानंतर, आता राजकीय वातावरणही तापले आहे. राजस्थानातील एका निवडणूक कार्यक्रमात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पीएम चा अर्थ 'पनौती मोदी' असल्याचे म्हटले होते. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निशाणा साधला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता अथवा मुंबईत खेळवला गेला असता तर भारत जिंकला असता, असे त्यांनी म्हटले आहे. 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर... -यावेळी ममता बॅनर्जी यांनी भगव्या जर्सीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर त्याचा परिणामही दिसून आला. यामुळे, भारतीय संघालाय भगव्या रंगाची जर्सी घालावी लागली नाही. भाजप प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून बघते आणि त्याचा  नकारात्मक परिणामही  दिसून येतो.  

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी सराव सत्रादरम्यान भारतीय संघाने परिधान केलेल्या जर्सीवरून प्रश्न उपस्थित केला होता. खेळाडूंनी भगव्या रंगाची जर्सी का परिधान केली, हे समजण्या पलिकडे आहे. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. एवढेच नाही, तर भाजपच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करायचे आहे, असेही ममता यांनी म्हटले होते.

आणखी तीन महिने राहणार हे सरकार - हे सरकार आणखी तीन महिने केंद्रात राहील, असे म्हणत, गोवंश तस्करीचा मुद्दाही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. बांगलादेशात तस्करीसाठी वेगवेगळ्या राज्यांतून गायी आणल्या जातात. प्रश्न असा आहे की, तेथे "पैसे" कोण घेते? देशातील बँकिंग क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे, सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) विकले जात आहेत. कोलकात्याच्या 'सिलिकॉन व्हॅली' प्रकल्पात सर्व मोठ्या आयटी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. खरे तर, धोकादायक वाटणाऱ्या सर्व लोकांना बदनाम करण्याची भाजपला सवय झाली आहे. केवळ मोठ-मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही. एकीकडे भाजप आपल्या यशाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे जनतेला जमिनीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारला याची कसलीही काळजी नाही, असेही ममतांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी