शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:03 IST

19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवानंतर, आता राजकीय वातावरणही तापले आहे. राजस्थानातील एका निवडणूक कार्यक्रमात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पीएम चा अर्थ 'पनौती मोदी' असल्याचे म्हटले होते. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निशाणा साधला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता अथवा मुंबईत खेळवला गेला असता तर भारत जिंकला असता, असे त्यांनी म्हटले आहे. 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर... -यावेळी ममता बॅनर्जी यांनी भगव्या जर्सीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर त्याचा परिणामही दिसून आला. यामुळे, भारतीय संघालाय भगव्या रंगाची जर्सी घालावी लागली नाही. भाजप प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून बघते आणि त्याचा  नकारात्मक परिणामही  दिसून येतो.  

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी सराव सत्रादरम्यान भारतीय संघाने परिधान केलेल्या जर्सीवरून प्रश्न उपस्थित केला होता. खेळाडूंनी भगव्या रंगाची जर्सी का परिधान केली, हे समजण्या पलिकडे आहे. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. एवढेच नाही, तर भाजपच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करायचे आहे, असेही ममता यांनी म्हटले होते.

आणखी तीन महिने राहणार हे सरकार - हे सरकार आणखी तीन महिने केंद्रात राहील, असे म्हणत, गोवंश तस्करीचा मुद्दाही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. बांगलादेशात तस्करीसाठी वेगवेगळ्या राज्यांतून गायी आणल्या जातात. प्रश्न असा आहे की, तेथे "पैसे" कोण घेते? देशातील बँकिंग क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे, सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) विकले जात आहेत. कोलकात्याच्या 'सिलिकॉन व्हॅली' प्रकल्पात सर्व मोठ्या आयटी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. खरे तर, धोकादायक वाटणाऱ्या सर्व लोकांना बदनाम करण्याची भाजपला सवय झाली आहे. केवळ मोठ-मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही. एकीकडे भाजप आपल्या यशाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे जनतेला जमिनीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारला याची कसलीही काळजी नाही, असेही ममतांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी