शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 8:36 PM

“आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालचे नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल."

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुच्छेद 370 हटविल्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अनुच्छेद 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांचे स्वातंत्र्य, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे हित कमकुवत झाले आहे, असे ममतांनी म्हटले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालच्या नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल." एवढ्यावरच ममता थांबल्या नाही, तर एवढ्या मोठ्या निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना कसल्याही प्रकारची शरम नाही, असेही ममता म्हणाल्या. 

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

एक देश-एक रेशन कार्ड प्रणालीला विरोध नाही -सर्वोच्च न्यायालयाच्या एक देश एक रेशन कार्ड धोरणाचा स्वीकार करण्यासंदर्भात बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, "आम्हाला एक जेश-एक रेशन कार्ड प्रणालीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या नाही. आम्ही तीन महिन्यांतच लागू करू. काही लोकांकडे आधारकार्ड नाही, आम्ही तयार करत आहोत," असेही ममता म्हणाल्या.

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालArticle 370कलम 370