शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; "हे तुकडे तुकडे मंच...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:44 IST

नीती आयोगाच्या बैठकीवरून ममता बॅनर्जींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. 

नवी दिल्ली - भाजपानं सरकार बनवलं परंतु त्यांच्याकडे जनादेश नाही. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच वेळ आली जेव्हा भाजपाला एकट्याच्या बळावर सरकार बनवता आलं नाही असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

शनिवारी ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी म्हटलं की, २०२४ मध्ये मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजपा सत्तेत आलं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये भाजपानं त्यांना झुकतं माप दिलं. राजकीयदृष्ट्या मजबुरीमुळे पक्षपाती बजेट सादर केले. ज्यातून विरोधकांचं सरकार असलेल्या राज्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.

तसेच भाजपा पश्चिम बंगालचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या कुणी नेत्याने आसामचं विभाजन करण्यास सांगितले, कुणी बिहारचं विभाजन करण्याची भाषा केली. मी त्यांना गँग बोलणार नाही कारण हा असंसदीय शब्द आहे त्यामुळे मी त्यांना तुकडे तुकडे मंच बोलेन असा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लगावला. 

नीती आयोगावर साधला निशाणा

दरम्यान, नीती आयोग हटवा, नियोजना आयोग पुन्हा आणा. नियोजन आयोगाची रचना होती त्यातून देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कल्पना होती. नीती आयोगाला कोणतेही अधिकार नाहीत. हे राज्य सरकारांशी समन्वयाने काम करत नाही असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. इंडिया आघाडीचे इतर अनेक मुख्यमंत्री NITI आयोगाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत यावर ममता बॅनर्जींनी 'मी केवळ बंगालचाच नाही तर इंडिया आघाडी शासित राज्यांचाही मुद्दा उपस्थित करणार आहे असं भाष्य त्यांनी केले. 

अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार 

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे. अर्थसंकल्प देशविरोधी आणि त्यांच्या राज्यांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी