शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; "हे तुकडे तुकडे मंच...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:44 IST

नीती आयोगाच्या बैठकीवरून ममता बॅनर्जींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. 

नवी दिल्ली - भाजपानं सरकार बनवलं परंतु त्यांच्याकडे जनादेश नाही. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच वेळ आली जेव्हा भाजपाला एकट्याच्या बळावर सरकार बनवता आलं नाही असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

शनिवारी ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी म्हटलं की, २०२४ मध्ये मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजपा सत्तेत आलं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये भाजपानं त्यांना झुकतं माप दिलं. राजकीयदृष्ट्या मजबुरीमुळे पक्षपाती बजेट सादर केले. ज्यातून विरोधकांचं सरकार असलेल्या राज्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.

तसेच भाजपा पश्चिम बंगालचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या कुणी नेत्याने आसामचं विभाजन करण्यास सांगितले, कुणी बिहारचं विभाजन करण्याची भाषा केली. मी त्यांना गँग बोलणार नाही कारण हा असंसदीय शब्द आहे त्यामुळे मी त्यांना तुकडे तुकडे मंच बोलेन असा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लगावला. 

नीती आयोगावर साधला निशाणा

दरम्यान, नीती आयोग हटवा, नियोजना आयोग पुन्हा आणा. नियोजन आयोगाची रचना होती त्यातून देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कल्पना होती. नीती आयोगाला कोणतेही अधिकार नाहीत. हे राज्य सरकारांशी समन्वयाने काम करत नाही असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. इंडिया आघाडीचे इतर अनेक मुख्यमंत्री NITI आयोगाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत यावर ममता बॅनर्जींनी 'मी केवळ बंगालचाच नाही तर इंडिया आघाडी शासित राज्यांचाही मुद्दा उपस्थित करणार आहे असं भाष्य त्यांनी केले. 

अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार 

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे. अर्थसंकल्प देशविरोधी आणि त्यांच्या राज्यांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी