शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; "हे तुकडे तुकडे मंच...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:44 IST

नीती आयोगाच्या बैठकीवरून ममता बॅनर्जींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. 

नवी दिल्ली - भाजपानं सरकार बनवलं परंतु त्यांच्याकडे जनादेश नाही. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच वेळ आली जेव्हा भाजपाला एकट्याच्या बळावर सरकार बनवता आलं नाही असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

शनिवारी ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी म्हटलं की, २०२४ मध्ये मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजपा सत्तेत आलं. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये भाजपानं त्यांना झुकतं माप दिलं. राजकीयदृष्ट्या मजबुरीमुळे पक्षपाती बजेट सादर केले. ज्यातून विरोधकांचं सरकार असलेल्या राज्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.

तसेच भाजपा पश्चिम बंगालचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या कुणी नेत्याने आसामचं विभाजन करण्यास सांगितले, कुणी बिहारचं विभाजन करण्याची भाषा केली. मी त्यांना गँग बोलणार नाही कारण हा असंसदीय शब्द आहे त्यामुळे मी त्यांना तुकडे तुकडे मंच बोलेन असा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लगावला. 

नीती आयोगावर साधला निशाणा

दरम्यान, नीती आयोग हटवा, नियोजना आयोग पुन्हा आणा. नियोजन आयोगाची रचना होती त्यातून देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कल्पना होती. नीती आयोगाला कोणतेही अधिकार नाहीत. हे राज्य सरकारांशी समन्वयाने काम करत नाही असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. इंडिया आघाडीचे इतर अनेक मुख्यमंत्री NITI आयोगाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत यावर ममता बॅनर्जींनी 'मी केवळ बंगालचाच नाही तर इंडिया आघाडी शासित राज्यांचाही मुद्दा उपस्थित करणार आहे असं भाष्य त्यांनी केले. 

अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार 

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे. अर्थसंकल्प देशविरोधी आणि त्यांच्या राज्यांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी