शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 10:53 AM

West Bengal : केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखल, अहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश

ठळक मुद्देकेंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखलअहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष आणि असामाजिक घटक यांच्यात हिंसाचाराच्या बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात हिंसाचार होत असल्याचं समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) लोकांकडून हा हिंसाचार सुरू असल्याचा आरोप भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह वर्मा यांनी केला आहे. "तृणमूल काँग्रेसच्या विजयांनंतर पक्षाच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली," असं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी तृणमूल कांग्रेसला इशारा देत तुमच्या खासदारांना, मुख्यमंत्री आणि आमदारांनाही दिल्लीलादेखील यायचं आहे, असं म्हटलं.पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह यांनी ट्वीट करून तृणमूल काँग्रेसवर टीका केली. "टीएमसीच्या गुंडांनी निवडणुका जिंकताच आमच्या कार्यकर्त्यांचे प्राण घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या, घराला आग लावत आहेत. लक्षात ठेवा, तृणमूल काँग्रेसचे खासदार, मुख्यमंत्री, आमदार यांनाही दिल्ली येथे यावे लागेल. हा इशारा म्हणून समजा. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, खून नव्हे," असंही ते म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखलपश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर रविवारी (२ मे) हुगळीत हिंसाचार झाला होता. अरामबागमधील भाजप कार्यालयालाही काही अज्ञात लोकांनी आग लावली होती. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सतत सुरू असलेल्या राजकीय हिंसाचार आणि ११ जणांच्या मृत्यूनंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने राज्य सरकारला विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करुन राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराचा अहवाल देण्यास सांगितलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसdelhiदिल्लीHome Ministryगृह मंत्रालय