शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

West Bengal Election 2021: २०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:10 IST

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलअमित शाहांना दिले प्रत्युत्तरभाजपला मोठा रसगुल्ला मिळेल - ममता बॅनर्जी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळले. पश्चिम बंगालमध्ये ज्या ३० मतदारसंघांत ७९.७९ टक्के मतदान झाले. यानंतर पुन्हा एकदा प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावर ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले असून, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल, असा टोला लगावला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee says bjp will get big rosogolla)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल

भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामे करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला. 

दरम्यान, पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्या, तरी सर्वांत जास्त चर्चा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची सुरू आहे. पश्चिम बंगालसह आसाम विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्पातील मतदान शनिवारी पार पडले.  आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७७ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा