शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचार थांबला की मगच ‘सीएए’वर सुनावणी घेऊ; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:18 IST

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सुरू असलेला हिंसाचार थांबल्यावरच आम्ही त्या कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सुरू असलेला हिंसाचार थांबल्यावरच आम्ही त्या कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.हा कायदा घटनात्मक वैध असल्याचे जाहीर करावे यासाठी पुनित कौर धांडा यांनी जनहित याचिका केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने वरील मत व्यक्त करत याचिकाकर्तीलाही धारेवर धरले. हा कायदा राज्यघटनेच्या व भारतीयांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करावे व या कायद्यासंदर्भात अफवा पसरवून जे राजकीय पक्ष हिंसाचारास खतपाणी घालत आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती त्यात आहे.याचिकेच्या स्वरूपाविषयी नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश अ‍ॅड. धांडा यांना म्हणाले, या कायद्यावरून हिंसाचार सुरू असताना शांततेचे प्रयत्न हवेत. अशा याचिकांनी तसे होण्यास मदत होणार नाही.अ‍ॅड. धांडा यांना उद्देशून न्या. बोबडे म्हणाले, तुम्हीही कायदा शिकला आहात ना? अशी याचिका आम्ही प्रथमच पाहत आहोत. एखादा कायदा वैध असल्याचे आम्ही कसे जाहीर करावे? संसदेने केलेला कायदा घटनासंमतच असणार, असे गृहीत धरले जाते. कोणी वैधतेस आव्हान दिले तर न्यायालय ते तपासून आम्ही निकाल देतो.>६0 याचिका दाखल‘सीएए’च्या वैधतेला विविध मुद्द्यांवर आव्हान देणाऱ्या सुमारे ६० याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांवर तातडीने सुनावणीची विनंती केली गेली, तेव्हाही न्यायालयाने, आधी हिंसाचार थांबायला हवा, असे सांगितले होते. नंतर त्या सर्व याचिकांवर केंद्र सरकारला नोटीस काढून २२ जानेवारीस सुनावणी ठेवण्यात आली. धांडा यांची ही उलटी याचिकाही त्याचवेळी सुनावणीस घेतली जाईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय