शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

हिंसाचार थांबला की मगच ‘सीएए’वर सुनावणी घेऊ; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:18 IST

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सुरू असलेला हिंसाचार थांबल्यावरच आम्ही त्या कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सुरू असलेला हिंसाचार थांबल्यावरच आम्ही त्या कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.हा कायदा घटनात्मक वैध असल्याचे जाहीर करावे यासाठी पुनित कौर धांडा यांनी जनहित याचिका केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने वरील मत व्यक्त करत याचिकाकर्तीलाही धारेवर धरले. हा कायदा राज्यघटनेच्या व भारतीयांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करावे व या कायद्यासंदर्भात अफवा पसरवून जे राजकीय पक्ष हिंसाचारास खतपाणी घालत आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती त्यात आहे.याचिकेच्या स्वरूपाविषयी नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश अ‍ॅड. धांडा यांना म्हणाले, या कायद्यावरून हिंसाचार सुरू असताना शांततेचे प्रयत्न हवेत. अशा याचिकांनी तसे होण्यास मदत होणार नाही.अ‍ॅड. धांडा यांना उद्देशून न्या. बोबडे म्हणाले, तुम्हीही कायदा शिकला आहात ना? अशी याचिका आम्ही प्रथमच पाहत आहोत. एखादा कायदा वैध असल्याचे आम्ही कसे जाहीर करावे? संसदेने केलेला कायदा घटनासंमतच असणार, असे गृहीत धरले जाते. कोणी वैधतेस आव्हान दिले तर न्यायालय ते तपासून आम्ही निकाल देतो.>६0 याचिका दाखल‘सीएए’च्या वैधतेला विविध मुद्द्यांवर आव्हान देणाऱ्या सुमारे ६० याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांवर तातडीने सुनावणीची विनंती केली गेली, तेव्हाही न्यायालयाने, आधी हिंसाचार थांबायला हवा, असे सांगितले होते. नंतर त्या सर्व याचिकांवर केंद्र सरकारला नोटीस काढून २२ जानेवारीस सुनावणी ठेवण्यात आली. धांडा यांची ही उलटी याचिकाही त्याचवेळी सुनावणीस घेतली जाईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय