शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:42 IST

Air Chief Marshal AP Singh: 'सक्षम सेना नसेल, तर कोणीही हल्ला करू शकतो. व्हेनेझुएला आणि इराक अलीकडची उदाहरणे आहेत.'

Air Chief Marshal AP Singh: भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बुधवारी (21 जानेवारी 2026) बदलत्या जागतिक परिस्थितीत युद्धाच्या नव्या स्वरूपावर आपली भूमिका मांडली. भारतीय वायुसेनेची वाढती क्षमता आणि अलीकडील ऑपरेशन्समधील भारताच्या यशाचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशाराही दिला.

काही तासांत शत्रूला गुडघ्यावर आणण्याची क्षमता

वायुसेना प्रमुख म्हणाले, युद्धग्रस्त भागांतून नागरिकांची सुटका करणे, जसे आम्ही सुदानमध्ये केले किंवा दहशतवादी पायाभूत सुविधा आणि दहशतवाद्यांवर अचूक हल्ले करणे, भारतीय वायुसेनेने सर्व ठिकाणी आपली क्षमता सिद्ध केली आहे. पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर आम्ही काही तासांतच हल्ले करून त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. हीच वायुसेनेची ताकद आहे.

केवळ आर्थिक शक्ती पुरेशी नाही

राष्ट्रीय सुरक्षेसाठी सैन्यशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना एअर चीफ मार्शल सिंह म्हणाले, एखाद्या देशाची सार्वभौमता जपण्यासाठी फक्त आर्थिक बळ पुरेसे नसते. सैन्यशक्ती हेच राष्ट्रीय शक्तीचे अंतिम मोजमाप आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही देश सुरक्षित राहीलच असे नाही. इतिहासाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, एक काळ असा होता, जेव्हा भारत आणि चीन मिळून जागतिक GDP च्या सुमारे 60 टक्के भागावर नियंत्रण ठेवत होते. तरीही आपल्यावर आक्रमण झाले.

मजबूत सेना का आवश्यक?

मजबूत सेनेची गरज स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटले, प्रत्येक देशाकडे सक्षम सेना असणे आवश्यक आहे. ती नसेल तर कोणीही हल्ला करू शकतो. व्हेनेझुएला आणि इराक ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. त्याचबरोबर, सैन्यशक्तीचा वापर करण्याची इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. इच्छाशक्ती नसेल तर संयम दाखवला तरी तो दुर्बलता समजला जातो. मात्र, जेव्हा तुम्ही बलवान असता आणि तरीही संयम बाळगता, तेव्हा तो सामर्थ्याचा संकेत ठरतो, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Air Force Chief Singh Warns Pakistan: 'Force Kneeling in Hours'

Web Summary : Air Chief Marshal AP Singh asserted India's air power, highlighting its ability to swiftly subdue enemies like Pakistan. He emphasized military strength's vital role in national security, citing historical examples and the necessity of both capability and the will to use it.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानIndiaभारत