शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:30 IST

'पंतप्रधान आणि सरकार आपली चूक मान्य करायला तयार नाही'

राम मगदूमबेळगाव : राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा यांनी अवमान केला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यच करायला तयार नाहीत, आम्ही डॉक्टर आंबेडकरांचा अवमान कदापिही सहन करू शकत नाही. डॉ. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांची विचारधारा जपण्यासाठी, तिच्या सन्मानासाठी या सरकारविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढू, असा निर्धार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केला.बेळगाव येथे शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त आयोजित काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी समितीमध्ये ते बोलत होते.लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. कारण आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे न्यायालयाने जी माहिती शेअर करण्याचे आदेश दिले होते, ते थांबवले जाऊ शकतात, असे करून सरकार काय लपवू पाहत आहे, असा सवालही खरगे यांनी केला.कधी मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, कधी त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाते, कधी यादीतील मतदारांची संख्या अचानक वाढवली जाते, कधी मतदानाच्या शेवटच्या क्षणी मतांची टक्केवारी अनपेक्षितपणे वाढते. यामुळे पडणाऱ्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडत नाही, असेही खरगे म्हणाले.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानास्पद विधान केले. आम्ही त्याला आक्षेप घेतला, निषेध केला, निदर्शने केली. आता देशभर निदर्शने होत आहेत; पण पंतप्रधान आणि सरकार आपली चूक मान्य करायला तयार नाही. अमित शाहांकडून माफी आणि राजीनामा मागणे तर दूरच, त्यांनी आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असेही खरगे म्हणाले.२०२५ हे पक्षाच्या संघटनात्मक सक्षमीकरणाचे वर्ष असेल. आम्ही संघटनेतील सर्व रिक्त पदे भरू. आम्ही उदयपूर घोषणेची पूर्ण अंमलबजावणी करू. पक्ष संघटनेला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी सुसज्ज करू, असेही ते म्हणाले.

बेळगावहून नवा संदेश, नवा संकल्प घेऊन जाणार‘आम्ही बेळगावहून नवा संदेश आणि नवीन संकल्प घेऊन परतणार आहोत. त्यामुळेच आम्ही या सभेला ‘नव सत्याग्रह’ असे नाव दिले आहे. कारण आज घटनात्मक पदावर असणारेही महात्मा गांधींच्या सत्याग्रहावर शंका घेत आहेत’, ज्यांनी संविधानाची शपथ घेतली तेच खोटेपणा पसरवत आहेत. सत्तेत असलेले लोक खोट्याचा आधार घेतात आणि आमच्यावर आरोप करतात. आम्हाला अशा लोकांना पराभूत करायचे आहे, असेही खरगे म्हणाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी