शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 26, 2020 10:09 IST

डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही.

 नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. यातच राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी रविवारी चीनपासून पाकिस्तानपर्यंत सर्वांनाच इशारा दिला आहे. शत्रू राष्ट्रांना इशारा देताना डोवाल म्हणाले, इतिहास साक्षी आहे, की भारताने कधीही कुण्याही देशावर हल्ला केलेला नाही. मात्र, जेथे धोका दिसेल, तेथे प्रहार केला जाईल, हे निश्चित. विजयादशमी निमित्त उत्तराखंडमधील ऋषिकेश येथी परमार्थ निकेतनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. मात्र, ते आम्ही आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी करू. 

भारत एक सभ्य देश आहे. ज्याचे अस्तित्व अनादी काळापासून आहे. भारत आपली समृद्ध संस्कृती आणि सभ्यतेमुळेच कुठलाही धर्म अथवा भाषेच्या परिघात बांधला गेला नाही. एवढेच नाही, तर याच भूमीवरून वसुधैव कुटुंबकम आणि प्रत्येक मानसात इश्वराचा अंश आहे, या तत्वज्ञानाचा प्रचार झाला. एक देश म्हणून भारताला मजबूत ओळख देण्यात आणि संस्कारक्षम बनविण्यात येथील संत मंडळींचे मोठे योगदान आहे. येथील संतांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे, असेही डोवाल म्हणाले.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

डोवालांच्या भाषणावर सरकारचे स्पष्टिकरण -एनएसए डोवाल यांच्या वक्तव्यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे, एनएसए डोवाल यांचे वक्तव्य चीनसंदर्बात नसून, ते भारताच्या आध्यात्मिक विचारांसंदर्भात आहे. मात्र, भारत कुठल्याही देशाला घाबरणार नाही. तसेच युद्धाच्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे डोवाल यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालIndiaभारतchinaचीन