शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 26, 2020 10:09 IST

डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही.

 नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. यातच राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी रविवारी चीनपासून पाकिस्तानपर्यंत सर्वांनाच इशारा दिला आहे. शत्रू राष्ट्रांना इशारा देताना डोवाल म्हणाले, इतिहास साक्षी आहे, की भारताने कधीही कुण्याही देशावर हल्ला केलेला नाही. मात्र, जेथे धोका दिसेल, तेथे प्रहार केला जाईल, हे निश्चित. विजयादशमी निमित्त उत्तराखंडमधील ऋषिकेश येथी परमार्थ निकेतनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. मात्र, ते आम्ही आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी करू. 

भारत एक सभ्य देश आहे. ज्याचे अस्तित्व अनादी काळापासून आहे. भारत आपली समृद्ध संस्कृती आणि सभ्यतेमुळेच कुठलाही धर्म अथवा भाषेच्या परिघात बांधला गेला नाही. एवढेच नाही, तर याच भूमीवरून वसुधैव कुटुंबकम आणि प्रत्येक मानसात इश्वराचा अंश आहे, या तत्वज्ञानाचा प्रचार झाला. एक देश म्हणून भारताला मजबूत ओळख देण्यात आणि संस्कारक्षम बनविण्यात येथील संत मंडळींचे मोठे योगदान आहे. येथील संतांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे, असेही डोवाल म्हणाले.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

डोवालांच्या भाषणावर सरकारचे स्पष्टिकरण -एनएसए डोवाल यांच्या वक्तव्यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे, एनएसए डोवाल यांचे वक्तव्य चीनसंदर्बात नसून, ते भारताच्या आध्यात्मिक विचारांसंदर्भात आहे. मात्र, भारत कुठल्याही देशाला घाबरणार नाही. तसेच युद्धाच्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे डोवाल यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालIndiaभारतchinaचीन