शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

आम्ही भाजपाला सोडले; पण हिंदुत्वावर ठामच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 1:33 AM

उद्धव ठाकरे । अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन

अयोध्या : भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, त्यामुळे शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली, याचा अर्थ आम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली असा होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी व पुत्र, तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह येथे श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेतर्फे १ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली.

त्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रात शिवसेनेने महाआघाडी सरकार स्थापन केले असले, तरी आतापर्यंतची हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, तसेच राज्य सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून, आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा दावा केला.

उद्धव ठाकरे यांना अयोध्येत उत्तर प्रदेश पोलिसांनी मानवंदना दिली. त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक उपस्थित होते. त्यात मुंबई-ठाण्यातून गेलेल्या शिवसैनिकांचाही समावेश होता. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जवळपास सर्व खासदार व राज्यातील मंत्रीही होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, कारण आमच्यात मतभेद नाहीत, असा दावाही त्यांनी केला.अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी होती. त्यासाठी केंद्राने कायदा करावा, असेही आम्ही म्हटले होते, पण केंद्राने कायदा केला नाही आणि नोव्हेंबरात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असे सांगून ठाकरे म्हणाले. तीन संत नजरकैदेतउद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचे काही संत-महन्तांनी जाहीर केले होते. त्यामुळे ते येण्याआधी महन्त परमहंस दास, महन्त राजू दास व हिंदू महासभेचे अध्यक्ष राकेश मिश्रा यांनी पोलिसांनी त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले होते.ट्रस्टवर हवे प्रतिनिधित्वउद्धव ठाकरे अयोध्येत असतानाच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी राम मंदिरासाठीच्या ट्रस्टवर शिवसेनेचा प्रतिनिधी नेमण्यात यावा, अशी मागणी केली.नदीची आरती टाळलीउद्धव ठाकरे यांची संध्याकाळी अयोध्येतील शरयू नदीची आरती करण्याचीही इच्छा होती. त्यांच्या मूळ कार्यक्रमातही त्याचा समावेश होता, पण कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला सर्व नेत्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनीही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. श्रीरामाच्या दर्शनानंतर ते लगेचच लखनौला आले आणि तेथून मुंबईकडे निघाले.भवनासाठी जमीन द्याउद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून इथे येणाºया रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ वा उत्तर प्रदेश सरकार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, अयोध्या वा जवळच्या फैजाबादमध्ये त्यासाठी जमीन मिळू शकेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा