शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भारत-पाकिस्तान एकमेकांना 'पाण्यात' पाहणार; लवकरच पाण्यावरुन वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:28 IST

सिंधू जल कराराचं उल्लंघन होत असल्याचा भारत, पाकिस्तानचा आरोप

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या काही दिवसात पाण्यावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला. या कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. त्यामुळे लवकरच हा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न महत्त्वाचा आणि संवेदनशील ठरणार आहे. पाकिस्तानात सध्या पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या कराचीजवळच्या भागातील महिलांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. पाकिस्तानातल्या बऱ्याच भागांमध्ये हेच चित्र आहे. भारतातील परिस्थितीदेखील वेगळी नाही. भारतातील तीन-चतुर्थांश जनतेच्या घरांमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. याशिवाय देशातील 70 टक्के पाणी प्रदूषित झालं आहे, अशी आकडेवारी सरकारच्या संशोधनातून समोर आली आहे. दुष्काळामुळे नद्या, धरणांमधील चित्र भयाण आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील पाणी प्रश्न पेटू शकतो, असं वृत्त ब्ल्यूमबर्गनं दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करार झाला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला होता. याच कराराचं उल्लंघन होत असल्याचा भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांवर केला आहे. सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. यावर पाकिस्ताननं आक्षेप घेतला आहे. भारताकडून सिंधू जल कराराचा उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानला आहे. 

या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचं एक पथक चिनाब नदीजवळ पाठवणार आहेत. तर चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. यामुळे लवकरच हा प्रश्न चिघळू शकतो. याचा परिणाम केवळ दक्षिण आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगावर होईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानwater scarcityपाणी टंचाईImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी