शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
3
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
4
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
5
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
6
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
7
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
8
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
9
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
10
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
11
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
12
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
13
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
14
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
15
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
16
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
17
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
18
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
19
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
20
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल

उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:39 IST

North India News: उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू- काश्मीरमध्येही विविध दुर्घटनांतील मृतांची संख्या ४१ झाली आहे.

नवी दिल्ली -  उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू- काश्मीरमध्येही विविध दुर्घटनांतील मृतांची संख्या ४१ झाली आहे. उत्तराखंडमध्ये चामोली, रुद्रप्रयाग आणि टिहरीमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या महापुरात ८ जण बेपत्ता असून, हिमाचलमध्येही भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुद्रप्रयागमध्ये आलेल्या महापुरात अनेक वाहने व घरे गाळात दबली असून, सहा जण बेपत्ता आहेत.  

मध्य प्रदेशात १५ जिल्ह्यांना इशारायेत्या दोन-तीन दिवसांत मध्य प्रदेशातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, १५ जिल्ह्यांत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. १ सप्टेंबरपर्यंत स्थानिक प्रशासनास सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

वैष्णोदेवी यात्रेवरून वादवैष्णादेवी यात्रा मार्गावर भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४ वर गेल्याने प्रशासन व देवस्थान मंडळात वाद निर्माण झाला आहे.वारंवार इशारे देऊनही एवढे भाविक २ या भागात काय करीत होते, असा प्रश्न मंत्र्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी वैष्णोदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असलेले नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याविरुद्ध आघाडी उभारली आहे.मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीचा दोष देवस्थान मंडळावर लावला. हवामान विभागाने गंभीर इशारे देऊनही यात्रेकरू तेथे गेलेच कसे, असा प्रश्न त्यांनी केला.

पंजाब, तेलंगणात आपत्तीराज्यात १९८८ नंतर प्रथमच महापुराची आपत्ती मोठ्या प्रमाणात असून सतलज, व्यास आणि रावी नद्यांसह इतर नद्या- नाल्यांना महापूर आला आहे. यामुळे अनेक गावे पाण्यात आहेत. दक्षिणेत तेलंगणातील कामारेड्डी आणि मेदक जिल्ह्यांत गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला असून राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान झाले.

हिमाचलमध्ये बेहालहिमाचल प्रदेशात कुल्लूच्या डोभीमध्ये अचानक आलेल्या महापुरात अडकलेल्या १३० जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. रावी नदीला आलेल्या पुरामुळे चंबा जिल्ह्यातील सलूण गावातील ७ घरे नदीत सामावली. महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशUttarakhandउत्तराखंडfloodपूरlandslidesभूस्खलन