शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

गोंधळातच वक्फ अहवाल संसदेत; आमच्या आक्षेपांची दखलच घेतली नसल्याचा विरोधकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:46 IST

विरोधकांचा सभात्याग, थोड्या वेळाने परतले, यावेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

नवी दिल्ली : विरोधकांच्या गदारोळातच वक्फ संशोधन विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आला. जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी लोकसभेच्या पटलावर अहवाल ठेवला. तत्पूर्वी राज्यसभेत हा अहवाल ठेवण्यात आला. विरोधकांनी अहवालावर आक्षेप नोंदवत गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित झाले.

वक्फ अहवालात आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांचा समावेश केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा अहवाल मांडत असताना विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, काही वेळानंतर विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात परतले. लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू असताना गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांचे मुद्दे अहवालात जोडण्याची विनंती लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना केली. विरोधकाच्या मुद्द्यांवर भाजपचा कुठलाही आक्षेप नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर बिर्लांनी काही विरोधी पक्षांच्या सदस्यांचे मुद्दे अहवालासोबत जोडले असल्याचे लोकसभेत सांगितले. मात्र, जेपीसी अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडत असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

काय आहे जेपीसी अहवालात?हा अहवाल कोणत्याही एका विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही. किंबहुना, त्यात अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी उत्तमरीतीने निर्णय घेण्याचे सुचवले आहे. अल्पसंख्याक समाजातील बांधव मोठ्या श्रद्धेने आपल्या जमिनी वक्फला दान करतात. याचा लाभ शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून गरीब अल्पसंख्याकांना कसा होईल, याचा विचार केला आहे. 

काही धनदांडग्यांनी दान केलेल्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप हा अहवाल राज्यसभेच्या पटलावर ठेवताना मेधा कुलकर्णी यांनी केला. या विधेयकामुळे त्यांच्या जमिनी हातच्या जाणार असल्याने विरोध होत आहे. संयुक्त संसदीय समितीने गेल्या सहा महिन्यांत प्रत्येक राज्यातील अनेक घटकांशी संवाद साधून हा अहवाल तयार केला आहे, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

खोटा अहवाल असल्याचा खरगेंचा आरोपवक्फ संशोधन विधेयकासाठी स्थापन केलेल्या जेपीसीत विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदवले होते. मात्र, ते काढून टाकण्यात आल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. केवळ बहुमत असलेल्या सदस्यांची मते विचारात घेणे योग्य नाही. हा सर्व प्रकार लोकशाही व नियमांविरोधात असल्याचे नमूद करत पटलावर अहवाल खोटा असल्याचा दावा खरगे यांनी केला.

टॅग्स :Parliamentसंसद