शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 19:13 IST

Waqf Amendment Act: वक्फ कायद्याविरोधात विविध पक्षांसह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका दाखल केल्या आहेत.

Waqf Amendment Act: वक्फ सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षांसह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान, एकतर्फी आदेशाची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, वक्फ कायद्याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर आपली बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देऊ नये. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले होते, जे दोन्ही सभागृहात मंजूर झाले. संसदेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आले होते. राष्ट्रपतींनीही 5 एप्रिल रोजी या विधेयकाला त्याला मान्यता दिली, त्यानंतर हा कायदा बनला. या कायद्याविरोधात विरोधी पक्षांसह विविध मुस्लिम संघटना सातत्याने विरोध करत आहेत. 

सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविरोधात 15 याचिका दाखल करण्यात आल्या असून, येत्या 15 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांनी वक्फ कायदा हा संविधानाच्या कलम 14, 15 (समानता), 25 (धार्मिक स्वातंत्र्य), 26 (धार्मिक बाबींचे नियमन) आणि 29 (अल्पसंख्याक हक्क) अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, कायद्यातील बदल कलम (300 अ) मालमत्तेच्या अधिकाराच्या विरोधात आहे.

7 एप्रिल रोजी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि निजाम पाशा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती, पण न्यायालयाने तात्काळ सुनावणीस नकार दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर वक्फ कायद्याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीची अंदाजे तारीख 15 एप्रिल अशी लिहिली आहे. पण, कोणत्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही.

वक्फ कायद्याविरोधात 15 याचिकाकाँग्रेस खासदार मोहम्मद जावेद, एएमआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी, आप आमदार अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, समस्त केरळ जमियतुल उलेमा, मौलाना अर्शद मदनी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, इंडियन युनियन मुस्लिम लीग, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, अंजुम कादरी, तैय्यब खान, द्रविड मुन्नेत्र कझगम (द्रमुक), काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी, आरजेडी खासदार मनोज झा आणि जेडीयू नेते परवेझ सिद्दीकी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस