शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, पोलिसांचा लाठीमार    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 8:56 AM

बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलांच्या वसतीगृहांमधून पोलिस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बाँम्ब फेकण्यात आले.

वाराणसी, दि. 24 - बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलींच्या वसतिगृहांमधून पोलीस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. व्हीसी लॉजजवळ पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे वृत्त आल्यानंतर हा हिंसाचार भडकला. हे विद्यार्थी छेडछाडीच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींचे समर्थन करत आहेत.  रात्री 12 वाजल्यानंतर बीएचयूच्या वसतिगृहांमधून पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. या हिंसक घटनांमुळे विद्यापीठ 2 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास  कुलगुरू जी.सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थांवर सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक सुरक्षारक्षही जखमी झाले. तसेच बीएचयूच्या वसतीगृहांमधून पोलीस आणि सुरक्षारक्षकांवर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. 

संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सर सुंदरलाल रुग्णालयात घुसून दगडफेक केली. त्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण  निर्माण झाले. तसेच रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागला. हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 23 ठाण्यांच्या पथकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या 18 फैरी झाडल्या.  

दरम्यान कुलगुरूंनी या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आङे. याआधी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला आग लावली होती. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनी सुरक्षेच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरल्या आहेत. वाराणसीचे एसएसपी आर.के. भारद्वाज यांनी सांगितले की, "बीएचयूमझ्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच एसपी (शहर) दिनेश सिंह घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश