शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

पद्मावतीला हिंसक विरोध चुकीचा - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:59 IST

चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.

ठळक मुद्देकुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावीभाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहेलोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत

नवी दिल्ली - चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.

काही जणांनी पद्मावतीच्या कलाकारांविरोधात धमक्या दिल्या तसेच त्यांना मारहाण केल्यास इनाम जाहीर केली आहेत. त्यांची खिल्ली उडवताना नायडू म्हणाले की अशांकडे इतके पैसे तरी असतील की नाही शंका आहे. एक कोटी रुपये म्हणजे काय चेष्टा आहे का, असे सांगत प्रत्येकजण अशी इनामं  जाहीर करत असल्याचं ते म्हणाले.

'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत

लोकशाहीमध्ये अशा गोष्टींना थारा नसल्याचं नायडू म्हणाले असून जर कुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावी असं नायडू म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहे. अर्थात, एखाद्या विशिष्ट सिनेमाविषयी आपण बोलत नसून सगळ्याच बाबतीत हे लागू असल्याचं ते म्हणाले.

कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ?

लोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत आणि असहमतीचा अधिकार प्रत्येकाला असल्याबद्दल सर्वसहमती असायला हवी अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मातृभाषेचं महत्त्वही व्यंकय्या नायडूंनी यावेळी अधोरेखीत केलं. मातृभाषेचा आदर करायला हवा असं सांगताना, प्रत्येक मुलांनी आपली भाषा सिकायलाच हवी असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. आई, मातृभूमी, मातृभाषा, जन्मभूमी आणि महिलांचा सन्मान या पाच गोष्टी अत्यावश्यक असल्याचं नायडू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.