शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पद्मावतीला हिंसक विरोध चुकीचा - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:59 IST

चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.

ठळक मुद्देकुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावीभाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहेलोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत

नवी दिल्ली - चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.

काही जणांनी पद्मावतीच्या कलाकारांविरोधात धमक्या दिल्या तसेच त्यांना मारहाण केल्यास इनाम जाहीर केली आहेत. त्यांची खिल्ली उडवताना नायडू म्हणाले की अशांकडे इतके पैसे तरी असतील की नाही शंका आहे. एक कोटी रुपये म्हणजे काय चेष्टा आहे का, असे सांगत प्रत्येकजण अशी इनामं  जाहीर करत असल्याचं ते म्हणाले.

'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत

लोकशाहीमध्ये अशा गोष्टींना थारा नसल्याचं नायडू म्हणाले असून जर कुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावी असं नायडू म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहे. अर्थात, एखाद्या विशिष्ट सिनेमाविषयी आपण बोलत नसून सगळ्याच बाबतीत हे लागू असल्याचं ते म्हणाले.

कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ?

लोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत आणि असहमतीचा अधिकार प्रत्येकाला असल्याबद्दल सर्वसहमती असायला हवी अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मातृभाषेचं महत्त्वही व्यंकय्या नायडूंनी यावेळी अधोरेखीत केलं. मातृभाषेचा आदर करायला हवा असं सांगताना, प्रत्येक मुलांनी आपली भाषा सिकायलाच हवी असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. आई, मातृभूमी, मातृभाषा, जन्मभूमी आणि महिलांचा सन्मान या पाच गोष्टी अत्यावश्यक असल्याचं नायडू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.