शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयात हिंसाचार; बेकायदा लाकूड वाहतूक रोखल्याने तणाव; पोलिस गोळीबारात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:31 IST

आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

गुवाहाटी : आसाम-मेघालय सीमेवर पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे बेकायदा लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडविल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात आणि हिंसाचारात वनरक्षकासह सहा जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  या घटनेनंतर आसामपोलिसांनी मेघालयच्या सीमेवर असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच, मेघालयातील ७ जिल्ह्यांत हिंसाचार उफाळला असून, ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

७ जिल्ह्यांत तणाव; कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त- हिंसाचारानंतर मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या आदेशानुसार, या जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

- यामध्ये पश्चिम जैंतिया हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, रि-भोई, ईस्ट वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्स यांचा समावेश आहे.

- मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

शस्त्रे घेऊन जमाव घटनास्थळी दाखलसंशयितांनी ट्रकमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताच, वनरक्षकांनी त्यावर गोळीबार केला. त्यामुळे ट्रकचा एक टायर फुटला. त्यानंतर, वाहनाचा चालक आणि क्लीनरसह अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, परंतु इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. वनरक्षकांनी झिरकेंडिंग पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, पहाटे ५ च्या सुमारास मेघालयातील नागरिकांचा जमाव मोठ्या संख्येने खंजीर (डाओस) आणि इतर शस्त्रे घेऊन घटनास्थळी जमा झाला होता.

पोलिसांवर हल्लाअटक केलेल्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करणाऱ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला व त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करावा लागला, असे अली म्हणाले. या घटनेत एक वनसंरक्षक आणि मेघालयातील खासी समुदायाचे पाच लोक ठार झाले. स्थिती आता नियंत्रणात आहे, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्गम भागात सुरक्षाव्यवस्था मजबूत करत आहेत.  

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSmugglingतस्करी