शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

मेघालयात हिंसाचार; बेकायदा लाकूड वाहतूक रोखल्याने तणाव; पोलिस गोळीबारात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:31 IST

आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

गुवाहाटी : आसाम-मेघालय सीमेवर पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे बेकायदा लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडविल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात आणि हिंसाचारात वनरक्षकासह सहा जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  या घटनेनंतर आसामपोलिसांनी मेघालयच्या सीमेवर असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच, मेघालयातील ७ जिल्ह्यांत हिंसाचार उफाळला असून, ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे ३ च्या सुमारास मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्याच्या दिशेने बेकायदा लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडविला, असे पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी सांगितले.

७ जिल्ह्यांत तणाव; कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त- हिंसाचारानंतर मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या आदेशानुसार, या जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

- यामध्ये पश्चिम जैंतिया हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, रि-भोई, ईस्ट वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्स यांचा समावेश आहे.

- मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

शस्त्रे घेऊन जमाव घटनास्थळी दाखलसंशयितांनी ट्रकमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताच, वनरक्षकांनी त्यावर गोळीबार केला. त्यामुळे ट्रकचा एक टायर फुटला. त्यानंतर, वाहनाचा चालक आणि क्लीनरसह अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, परंतु इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. वनरक्षकांनी झिरकेंडिंग पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, पहाटे ५ च्या सुमारास मेघालयातील नागरिकांचा जमाव मोठ्या संख्येने खंजीर (डाओस) आणि इतर शस्त्रे घेऊन घटनास्थळी जमा झाला होता.

पोलिसांवर हल्लाअटक केलेल्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करणाऱ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला व त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करावा लागला, असे अली म्हणाले. या घटनेत एक वनसंरक्षक आणि मेघालयातील खासी समुदायाचे पाच लोक ठार झाले. स्थिती आता नियंत्रणात आहे, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्गम भागात सुरक्षाव्यवस्था मजबूत करत आहेत.  

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSmugglingतस्करी