शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 08:10 IST

सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी

इम्फाळ - मणिपूरचे विद्यमान पोलिस महासंचालक व सुरक्षा सल्लागार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राजभवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दोन सशस्त्र गटांत झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर झाला होता, असे तपासात आढळून आले.

राजभवनावर मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी व महिला निदर्शक सामील झाले होते. या निदर्शकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. तसेच सरकार, सुरक्षा दलांविरोधात घोषणा दिल्या.  यावेळी सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दिवसभरात नेमके काय काय घडले?

मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी एक स्वतंत्र मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेचे दहन केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राज्य सचिवालयाकडे वळविला. मात्र, त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी वाटेतच अडविले. मणिपूरमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

आसाम रायफल्सचे माजी महासंचालक तसेच माजी लेफ्टनंट जनरल पी. सी. नायर यांनी दावा केला होता की, मणिपूरमध्ये झालेल्या ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापरच झालेला नाही. मणिपूर पोलिसांनी हा दावा खोडून काढताना सांगितले की, ड्रोन हल्ला झालेल्या ठिकाणी त्यात वापरलेल्या क्षेपणास्त्रांच्या शेपटीकडील भागाचे अवशेष सापडले आहेत. नायर यांनी केलेला दावा ही आसाम रायफल्सची नव्हे, तर त्यांची वैयक्तिक मते आहेत. हल्ला करण्यासाठी वापरलेली ड्रोनही घटनास्थळी मिळाली आहेत. 

पाच दिवस इंटरनेट बंद

मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काक्चिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने मंगळवारी घेतला. विद्यार्थ्यांची निदर्शने व हिंसक घटनांमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. याआधी संपूर्ण मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारने ठरविले होते, पण नंतर आदेशात सुधारणा करण्यात आली. 

सीआरपीएफचे आणखी दोन हजार जवान तैनात

मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेला हिंसाचार लक्षात घेता केंद्र सरकारने सीआरपीएफच्या आणखी दोन बटालियनमधील सुमारे दोन हजार जवानांना तैनात केले आहे. तेलंगणातील वारंगळ येथून सीआरपीएफची ५८ क्रमांकाची बटालियन व झारखंडमधून ११२ क्रमांकाच्या सीआरपीएफ बटालियनला तातडीने मणिपूरमध्ये हलविण्यात आले आहे.   

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार