शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, विद्यार्थी धडकले थेट राजभवनावर; गोळीबारात महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 08:10 IST

सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी

इम्फाळ - मणिपूरचे विद्यमान पोलिस महासंचालक व सुरक्षा सल्लागार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राजभवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या झटापटीत ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दोन सशस्त्र गटांत झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर झाला होता, असे तपासात आढळून आले.

राजभवनावर मंगळवारी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी व महिला निदर्शक सामील झाले होते. या निदर्शकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. तसेच सरकार, सुरक्षा दलांविरोधात घोषणा दिल्या.  यावेळी सुरक्षा दलाबरोबरच्या झटापटीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दिवसभरात नेमके काय काय घडले?

मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी एक स्वतंत्र मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिमेचे दहन केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राज्य सचिवालयाकडे वळविला. मात्र, त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी वाटेतच अडविले. मणिपूरमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

आसाम रायफल्सचे माजी महासंचालक तसेच माजी लेफ्टनंट जनरल पी. सी. नायर यांनी दावा केला होता की, मणिपूरमध्ये झालेल्या ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापरच झालेला नाही. मणिपूर पोलिसांनी हा दावा खोडून काढताना सांगितले की, ड्रोन हल्ला झालेल्या ठिकाणी त्यात वापरलेल्या क्षेपणास्त्रांच्या शेपटीकडील भागाचे अवशेष सापडले आहेत. नायर यांनी केलेला दावा ही आसाम रायफल्सची नव्हे, तर त्यांची वैयक्तिक मते आहेत. हल्ला करण्यासाठी वापरलेली ड्रोनही घटनास्थळी मिळाली आहेत. 

पाच दिवस इंटरनेट बंद

मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काक्चिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने मंगळवारी घेतला. विद्यार्थ्यांची निदर्शने व हिंसक घटनांमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. याआधी संपूर्ण मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारने ठरविले होते, पण नंतर आदेशात सुधारणा करण्यात आली. 

सीआरपीएफचे आणखी दोन हजार जवान तैनात

मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेला हिंसाचार लक्षात घेता केंद्र सरकारने सीआरपीएफच्या आणखी दोन बटालियनमधील सुमारे दोन हजार जवानांना तैनात केले आहे. तेलंगणातील वारंगळ येथून सीआरपीएफची ५८ क्रमांकाची बटालियन व झारखंडमधून ११२ क्रमांकाच्या सीआरपीएफ बटालियनला तातडीने मणिपूरमध्ये हलविण्यात आले आहे.   

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार