शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:45 IST

सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता.

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. राधाकृष्णन यांना ४५२ मते पडली. त्यामुळे निवडणुकीनंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने विरोधी पक्षातील खासदारांना धन्यवाद देत या चर्चेला आणखी हवा दिली. याआधीही भाजपाने विरोधी पक्षातील मते फुटतील आणि राधाकृष्णन यांना मिळतील असा दावा केला होता. परंतु हे चित्र स्पष्ट झाले नाही की, अखेर विरोधकांमधील कोणत्या पक्षातील खासदारांनी सुदर्शन रेड्डी यांच्याविरोधात मतदान केले. 

सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता. काही छोट्या पक्षांनीही एनडीए उमेदवाराला साथ दिली. सी.पी राधाकृष्णन यांना विजयासाठी ३७७ मतांची गरज होती. अंतिम निकालात त्यांना ४४० मते मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात निकाल आले तेव्हा एनडीए उमेदवाराच्या खात्यात ४५२ मते मिळाली तर विरोधकांच्या ३१५ खासदारांनी मतदान केले. रेड्डी यांना ३०० मते मिळाली तर १५ मते बाद ठरवली असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

तर काही विरोधी खासदारांनी जाणुनबुजून चुकीचे मतदान केले, कमीत कमी १५ खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले असा दावा भाजपाने केला. मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका भाजपा नेत्याने महाराष्ट्र आणि झारखंड शिवाय राजस्थानातील काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचे म्हटले. सी.पी राधाकृष्णन झारखंड आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याचे राज्यपाल होते. भाजपा नेतृत्वातील महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. एका माध्यमाशी बोलताना विरोधी पक्षातील एका खासदाराने क्रॉस व्होटिंगची अपेक्षा होती असं म्हटलं. 

आम्हाला माहिती होते, काही जण पलटी मारतील. कारण रेड्डी यांच्या जिंकण्याची शक्यता कमी होती. विरोधी आघाडीची सत्ताधारी आघाडीशी तुलना होऊ शकत नाही. परंतु काय होऊ शकते हे पाहणे रंजक असेल असं विरोधी पक्षातील एका खासदाराने निकालाआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. काही नेत्यांनी आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीतील खासदारांवर संशय घेतला. आप आणि उद्धवसेनेने त्यांच्यावरील आरोप फेटाळला. त्याशिवाय मतदान गुप्त होतं, मग मते फुटली हे तुम्हाला कसं कळलं? काहीतरी गोलमाल आहे. १४ मते कुठल्या राज्यातील आहेत, फुटले म्हणजे महाराष्ट्रातील फुटले असं म्हटलं जाते. महाराष्ट्राची का बदनामी करताय? असा सवाल करत राजकारण करा पण मराठी माणसाला बदनाम करू नका असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी भाजपा-शिंदेसेनेला दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र