शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:45 IST

सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता.

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. राधाकृष्णन यांना ४५२ मते पडली. त्यामुळे निवडणुकीनंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने विरोधी पक्षातील खासदारांना धन्यवाद देत या चर्चेला आणखी हवा दिली. याआधीही भाजपाने विरोधी पक्षातील मते फुटतील आणि राधाकृष्णन यांना मिळतील असा दावा केला होता. परंतु हे चित्र स्पष्ट झाले नाही की, अखेर विरोधकांमधील कोणत्या पक्षातील खासदारांनी सुदर्शन रेड्डी यांच्याविरोधात मतदान केले. 

सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता. काही छोट्या पक्षांनीही एनडीए उमेदवाराला साथ दिली. सी.पी राधाकृष्णन यांना विजयासाठी ३७७ मतांची गरज होती. अंतिम निकालात त्यांना ४४० मते मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात निकाल आले तेव्हा एनडीए उमेदवाराच्या खात्यात ४५२ मते मिळाली तर विरोधकांच्या ३१५ खासदारांनी मतदान केले. रेड्डी यांना ३०० मते मिळाली तर १५ मते बाद ठरवली असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

तर काही विरोधी खासदारांनी जाणुनबुजून चुकीचे मतदान केले, कमीत कमी १५ खासदारांनी राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले असा दावा भाजपाने केला. मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका भाजपा नेत्याने महाराष्ट्र आणि झारखंड शिवाय राजस्थानातील काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचे म्हटले. सी.पी राधाकृष्णन झारखंड आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याचे राज्यपाल होते. भाजपा नेतृत्वातील महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. एका माध्यमाशी बोलताना विरोधी पक्षातील एका खासदाराने क्रॉस व्होटिंगची अपेक्षा होती असं म्हटलं. 

आम्हाला माहिती होते, काही जण पलटी मारतील. कारण रेड्डी यांच्या जिंकण्याची शक्यता कमी होती. विरोधी आघाडीची सत्ताधारी आघाडीशी तुलना होऊ शकत नाही. परंतु काय होऊ शकते हे पाहणे रंजक असेल असं विरोधी पक्षातील एका खासदाराने निकालाआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. काही नेत्यांनी आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीतील खासदारांवर संशय घेतला. आप आणि उद्धवसेनेने त्यांच्यावरील आरोप फेटाळला. त्याशिवाय मतदान गुप्त होतं, मग मते फुटली हे तुम्हाला कसं कळलं? काहीतरी गोलमाल आहे. १४ मते कुठल्या राज्यातील आहेत, फुटले म्हणजे महाराष्ट्रातील फुटले असं म्हटलं जाते. महाराष्ट्राची का बदनामी करताय? असा सवाल करत राजकारण करा पण मराठी माणसाला बदनाम करू नका असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी भाजपा-शिंदेसेनेला दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र