शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम, कोणाच्या मदतीची गरज नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 11:58 AM

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देदहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पॅराग्वे दौऱ्यादरम्यान बुधवारी (6 मार्च) भारतीय समुदायासमोर बोलत असताना व्यंकय्या नायडू यांनी असं सांगितलं आहे. दहशतवाद जगाच्या पाठीवरुन नष्ट झाला पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवादाविरोधात जगातील सर्व नागरिकांनी एकजूट व्हायला हवं

नवी दिल्ली - 'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे' असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पॅराग्वे दौऱ्यादरम्यान बुधवारी (6 मार्च) भारतीय समुदायासमोर बोलत असताना व्यंकय्या नायडू यांनी असं सांगितलं आहे.

व्यंकय्या नायडू यांनी 'आमचे संरक्षण करण्यास आम्ही तयार आहोत, कारण पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानला ज्या प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं त्यावरुन याची प्रचिती येते. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सैन्यावर किंवा नागरिकांवर हल्ला केला नाही. त्यामुळे कोणालाच त्रास झाला नाही, केवळ दहशतवाद्यांना त्रास सहन करावा लागला' असं म्हटलं आहे. तसेच 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, याला कुठलाही धर्म नसतो. दहशत माजवणे हे वाईटपणाचे लक्षण आहे. दहशतवाद जगाच्या पाठीवरुन नष्ट झाला पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवादाविरोधात जगातील सर्व नागरिकांनी एकजूट व्हायला हवं' असंही त्यांनी सांगितलं. 

'आम्हाला युद्ध नको आहे मात्र जर कोणी मुद्दाम आमची छेड काढली तर आम्ही त्याला सोडणार नाही' असंही व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या शेजारील राष्ट्राने दहशतवाद हे त्यांच्या देशाचे धोरणच ठरवले आहे. हा देश या दहशतवाद्यांना अन्न, पैसा आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहे. मात्र, आता ते घाबरले आहेत. ते जरी सार्वजनिकरित्या दहशतवाद रोखण्याचे दावे करत असले तरी दहशतवादाला पैसा पुरवण थांबवत नाहीत, असा दावा व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. 

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकTerrorismदहशतवाद