शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वाढवा; व्यंकय्या नायडूंचा रेणुका चौधरींना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:21 IST

राजीव गांधी हे देशाला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात उत्तम पंतप्रधान होते.

नवी दिल्ली: राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आलेल्या 85 खासदारांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. यावेळी या खासदारांनी निरोपाची भाषणे करताना आपले अनुभव सांगितले. यामध्ये काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांचे भाषण सर्वाधिक लक्षवेधी ठरले. त्यांनी युवा खासदार ते ज्येष्ठ खासदार असा संसदेतील प्रवास सर्वांसमोर मांडला. त्यांनी आपल्या भाषणात अनेक नेत्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटले की, व्यंकय्या नायडू अनेक 'किलो' पूर्वीपासून ओळखतात. अनेक लोकांनी माझ्या वजनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, व्यवसायिक जीवनात जास्त वजन असणे, हे श्रेयस्कर असते, असे विधान चौधरी यांनी केले. त्यावर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी रेणुका चौधरी यांची फिरकी घेतली. तुम्ही स्वत:चे वजन कमी करा आणि आपल्या पक्षाचे वजन वाढवण्याकडे लक्ष द्या, अशी शाब्दिक कोटी नायडू यांनी केली. त्यावर रेणुका चौधरी यांनी माझ्या पक्षाचे वजन सध्या योग्यच असल्याचे म्हटले. या दोघांच्या संभाषणामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. दरम्यान, रेणुका चौधरी यांनी आपल्या भाषणात अन्य नेत्यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, राजीव गांधी हे देशाला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात उत्तम पंतप्रधान होते. त्यांना प्रचंड वलय लाभले होते. ते संसदेत असले की संपूर्ण सभागृह हाऊसफुल्ल असायचे. याशिवाय, अरूण जेटली हेदेखील एक उमदा माणूस आहे. अनेक मुद्द्यांवर आमच्यात वाद असले तरी ते नेहमीच माझ्याशी चांगले वागले, असे चौधरी यांनी सांगितले.   

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभा