शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वाढवा; व्यंकय्या नायडूंचा रेणुका चौधरींना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:21 IST

राजीव गांधी हे देशाला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात उत्तम पंतप्रधान होते.

नवी दिल्ली: राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आलेल्या 85 खासदारांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. यावेळी या खासदारांनी निरोपाची भाषणे करताना आपले अनुभव सांगितले. यामध्ये काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांचे भाषण सर्वाधिक लक्षवेधी ठरले. त्यांनी युवा खासदार ते ज्येष्ठ खासदार असा संसदेतील प्रवास सर्वांसमोर मांडला. त्यांनी आपल्या भाषणात अनेक नेत्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटले की, व्यंकय्या नायडू अनेक 'किलो' पूर्वीपासून ओळखतात. अनेक लोकांनी माझ्या वजनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, व्यवसायिक जीवनात जास्त वजन असणे, हे श्रेयस्कर असते, असे विधान चौधरी यांनी केले. त्यावर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी रेणुका चौधरी यांची फिरकी घेतली. तुम्ही स्वत:चे वजन कमी करा आणि आपल्या पक्षाचे वजन वाढवण्याकडे लक्ष द्या, अशी शाब्दिक कोटी नायडू यांनी केली. त्यावर रेणुका चौधरी यांनी माझ्या पक्षाचे वजन सध्या योग्यच असल्याचे म्हटले. या दोघांच्या संभाषणामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. दरम्यान, रेणुका चौधरी यांनी आपल्या भाषणात अन्य नेत्यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, राजीव गांधी हे देशाला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात उत्तम पंतप्रधान होते. त्यांना प्रचंड वलय लाभले होते. ते संसदेत असले की संपूर्ण सभागृह हाऊसफुल्ल असायचे. याशिवाय, अरूण जेटली हेदेखील एक उमदा माणूस आहे. अनेक मुद्द्यांवर आमच्यात वाद असले तरी ते नेहमीच माझ्याशी चांगले वागले, असे चौधरी यांनी सांगितले.   

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभा