शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 7:14 PM

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज राज्यसभेमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रेड्डी यांच्या स्मृतींना उजाळा देताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे भावूक झाले. जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी 28 जुलै रोजी निधन झाले होते. सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळले. त्यावेळी जुने मित्र असलेल्या रेड्डी यांना श्रद्धांजली वाहताना उपराष्ट्रपतींना गहिवरून आले. ''रेड्डी यांचे जाणे माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे.  त्यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणीन काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक ज्येष्ठ खासदार, एक प्रभावी वक्ता आणि एक कुशल प्रशासक गमावला आहे.'' असे नायडूंनी सांगितले. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी जयपाल रेड्डी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचाही उल्लेख केला. ''रेड्डी माझे मित्र, ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक होते. आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार असताना आम्ही दोघेही एकाच बेंचवर बसत असू. त्यावेळी विधानसभेचे कामकाज सकाळी 8 वाजता सुरू होत असे. तेव्हा मी आणि रेड्डी सकाळी सात वाजता ब्रेकफास्टसाठी भेट असू. त्यावेळी विविध मुद्द्यांवर आमची चर्चा होत असे. रेड्डींचे प्रत्येक विषयाबाबतचे ज्ञान, आकलन क्षमता, इंग्रजी आणि तेलुगू भाषेवरील पकड आणि उर्दु भाषेबाबतची माहिती उत्तम होती. त्यांचे जाणे दु:खदायी आहे.'' असे सांगताना व्यंकय्या नायडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभा