शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वसुंधराराजेंच्या भवितव्याचा आज फैसला; १५९ नावांचा होईल निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 06:18 IST

वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजस्थान भाजपमधील तिकीट वाटपातील सस्पेन्स कायम असून, राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. रविवारी सायंकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, २०० पैकी उर्वरित १५९ विधानसभा मतदारसंघांतील तिकिटे निश्चित केली जाणार आहेत. पक्षाने ४१ जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. यात लोकसभेचे सहा खासदार आणि एका राज्यसभा सदस्याचा समावेश आहे. 

वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने कोणताही धोका पत्करावा लागू नये म्हणून वरिष्ठांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

२०० जागांची चार श्रेणींमध्ये विभागणी पक्षाच्या एका सरचिटणीसांनी सांगितले की, २०० जागा चार श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या आहेत. अ श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे पक्षाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर ब श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे भाजपचा विजय आणि पराभवाचा संमिश्र इतिहास आहे. सी श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे पक्ष तुलनेने कमकुवत असल्याचे मानले जाते. या उलट श्रेणी डच्या जागांवर गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपचा सतत पराभव झाला आहे. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय गुणवत्तेवरच घेतला जाईल.

पितृपक्ष संपताच वाढणार हालचाली अशुभ मानला जाणारा पितृपंधरवडा संपताच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगढ आणि मिझोराममध्ये या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना उद्यापासून वेग येणार आहे. या निवडणुकांमधील मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप आपापल्या उमेदवारांची नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे, तर तेलंगणमध्ये सत्ताधारी भारत राष्ट्रसमिती उद्या निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करणार आहे.काँग्रेसने २०१८ साली छत्तीसगढ विधानसभेत ९० पैकी ६८ जागा जिंकून पंधरा वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार यंदा छत्तीसगढ काँग्रेसच्या १५ ते २० विद्यमान आमदारांवर  टांगती तलवार आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणच्या उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकी पूर्ण झाल्या असून, नावांची घोषणा उद्यापासून होण्याची शक्यता आहे. 

२२ खोक्यात ४२ कोटी; बीआरएसकडून आरोपबंगळुरू : येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्वत्थम्मा, त्यांचे पती आर. अंबिकापती, मुलगी यांच्या घरातून ४२ कोटी रुपयांची रोकड आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील ही रक्कम भरलेले २२ खोके त्या घरातील पलंगाखाली दडवून ठेवले होते. हा काँग्रेसचा पैसा असून तो तेलंगणातील निवडणुकांसाठी हैदराबाद येथे नेणार होते, असा आरोप बीआरएस नेते हरीश राव यांनी केला.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपा