शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘वंदे भारत’ देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 05:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

मुंबई : पूर्वी खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालायात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की अमुक अमुक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटं, पाच मिनिटं थांबेल का पाहा. आज वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही? कधी येणार? यावर ते चर्चा करतात. पूर्वीचा आणि आत्ताचा हा महत्त्वाचा फरक आहे. वंदे भारत ट्रेन भारताची प्रगती आणि वेग या दोन्हींचे प्रतिबिंब आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल व रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, रामदास आठवले, विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.

वाहतूककोंडीला गुड बाय सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शनपर्यंत उन्नत मार्गाच्या एका मार्गिकेचे आणि बीकेसी ते लालबहादूर शास्त्री उड्डाणपुलाला जोडणाऱ्या मार्गिकेचे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन करून हे मार्ग वाहतुकीसाठी खुले केले. यामुळे बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूककोंडी कमी होणार असून, वाहनचालकांची २५ मिनिटांहून अधिक वेळेची बचत होईल.

बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासूनचे नाते!मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. इथे मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून मी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बोहरा समाजाला साद घातली. अल्जामिया-तुस-सैफियाह शिक्षण संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. संस्थेचे कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन यांच्याकडून पंतप्रधानांचा विशेष सत्कार करण्यात आला.     

महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्राला १३,५०० कोटी पहिल्यांदाच रेल्वेसाठी मिळाले आहेत. हे सामान्य लोकांचे सरकार आहे, फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. पंतप्रधानांचे पाच ट्रिलियन डॉलर भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वप्न असून त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल.      - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

भाविक आणि प्रवाशांसाठी दोन्ही वंदे भारत गाड्या मैलाचा दगड ठरतील. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच महाराष्ट्राला भरघोस निधी मंजूर झाला आहे. वंदे भारतसारख्या वेगवान गाड्या भारतीय रुळांवरून धावतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे.     - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईSolapurसोलापूरshirdiशिर्डीBJPभाजपा