शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भाजपला मोठा धक्का, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 12:28 IST

Yashpal Arya joins congress: पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी उत्तराखंडमध्ये पक्षांतर सुरू झालं आहे.

डेहराडून: उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येत्या काही महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, त्यापूर्वीच भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्याच्या राजकारणात दलितांचा मोठा चेहरा समजल्या जाणाऱ्या कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार संजीव आर्य यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या बदलीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. भाजप नेते यशपाल आर्य यांची पाच वर्षानंतर घरवापसी झाली आहे. यशपाल आर्य हे त्या 9 काँग्रेस आमदारांपैकी एक होते, ज्यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये येताच यशपाल आर्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं तर त्यांचा मुलगा संजीव आर्य यांनाही आमदार करण्यात आलं. निवडणुकीपूर्वीच यशपाल काँग्रेसमध्ये परतल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातोय.

कोण आहेत यशपाल आर्य  ?69 वर्षीय यशपाल आर्य उत्तराखंडच्या राजकारणातील सर्वात मोठा दलित चेहरा आहेत. 1989 मध्ये यशपाल आर्य पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडुन गेले. उत्तराखंडच्या स्थापनेनंतर 2002 च्या निवडणुकीत ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य झाले. तेव्हापासून यशपाल आर्य प्रत्येक निवडणुकीत जिंकत आले आहेत. यशपाल आर्य हे बाजपूरचे आमदार आहेत तर त्यांचा मुलगा संजीव आर्य नैनीताल मतदारसंघातून आमदार आहेत.  

टॅग्स :Uttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस