शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

बाबू काळजी घे, औषध वेळेवर घे! फेसबुक लाईव्ह करून प्रियकराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:58 IST

उत्तर प्रदेशात बिहारमध्ये आलेल्या तरुणाची गुरुद्वाऱ्याच्या अतिथीगृहात आत्महत्या

पाटणा: वर्षानुवर्षे प्रेमसंबंध नसताना अचानक एका व्यक्तीनं माघार घेतल्यास, प्रेमसंबंध तोडल्यास दुसऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो. अनेकदा अशा व्यक्ती टोकाचं पाऊल उचलतात. बिहारची राजधानी पाटण्यात असाच एक प्रकार घडला आहे. गुरुद्वाऱ्याच्या अतिथीगृहात घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रेमभंग झालेल्या तरुणानं फेसबुक लाईव्ह करून त्याचं आयुष्य संपवलं. स्वत:ची काळजी घे, वेळेवर औषध घे, असं म्हणत प्रियकरानं त्याची जीवनयात्रा संपवली.

बाललीला गुरुद्वाऱ्यातील एनआरआय अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०७ मध्ये तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणारा तरुण मूळचा उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याचं नाव परमजीत सिंग असं आहे. प्रेम प्रकरणातून परमजीतनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. सध्या अधिक तपास सुरू आहे.पत्नी मारते, आपटते, चावते; न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन! तक्रार करायला गेलेला पती रडकुंडीला

परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. परमजीत अनेक दिवसांपासून अतिथीगृहात वास्तव्यास होता. तो दिल्लीतल्या गुरुद्वाऱ्यात ग्रंथी होता. तिथे तो प्रवचन द्यायचा. तो दिवसभर सिमरनची भेट घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिनं भेटण्यास नकार दिला. त्यानंतर परमजीतनं आत्महत्या केली.जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...

फेसबुक लाईव्हमध्ये परमजीतनं त्याची प्रेयसी सिमरनसोबत बोलण्यासाठी, भेटण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. 'सिमरना शेकडो कॉल केले. पण तिनं उत्तर दिलं नाही. तिला भेटण्यासाठी खूपदा प्रयत्न केले. ती पाटणा साहेब गुरुद्वाऱ्यात आली असल्याचं समजलं म्हणून इथे आलो. ती आज गुरुद्वाऱ्यात आली. पण तिनं मला साधं वळूनही पाहिलं नाही. तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असं म्हणून ती निघून गेली,' अशा शब्दांत परमजीतनं त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

'तू खूष राहा. स्वत:चा संसार थाट. तू चांगलं शिक्षण घेते आहेस. त्यामुळे तुझ्याकडे सगळं असेल. शेवटी इतकंच सांगेन, मित्रांनो प्रेमाच्या भानगडीत पडू नका. तुमच्या आयुष्यावर लक्ष द्या. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आजही करतो आणि मरणानंतरही करेन. माझ्या सिमरनला कोणी काहीही बोलणार नाही. बाबू स्वत:ची काळजी घे. औषधं वेळेवर घे,' असं म्हणत परमजीतनं जीवन संपवलं.