शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

37 वर्षांपासून ना अंघोळ ना दात घासले; भारतामध्येही आहे अंघोळ न करणारा 'अंघोळ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 17:34 IST

दोन दिवसांपूर्वीच 50 वर्षांपासून अंघोळ न करणाऱ्या अमो हाजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतातील या व्यक्तीची चर्चा होत आहे.

जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीचा वयाच्या 94 व्या वर्षी मृत्यू झाला. जवळपास पाच दशकांनी अंघोळ करणाऱ्या या व्यक्तीचा अंघोळीनंतर काही महिन्यांतच मृत्यू झाला. त्याने जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ पाणी आणि साबनाचा वापर केला नव्हता. अमो हाजी असे त्यांचे नाव असून, ते इराणचे रहिवासी होते. अंघोळ केल्यावर मरेल, असे अमो हाजी म्हणायचे. विशेष म्हणजे, अंघोळ न करणारे अमो हाजी एकटेच नव्हते. भारतातही असा एक व्यक्ती आहे, जो जगातील सर्वात घाणेरडे माणूस म्हणून ओळख मिळवू शकतो.

35 वर्षांपासून आंघोळ किंवा ब्रश नाहीइराणच्या अमो हाजीनंतर सर्वात घाणेरडा व्यक्ती म्हणून ओळख मिळवणारा व्यक्ती भारतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या जवळील एका गावात राहणारे कैलाश सिंह यांनी गेल्या 37 वर्षांपासून ना अंघोळ केली आहे ना दात घासले आहेत. देशातील सर्व समस्या संपुष्टात याव्यात, यासाठी त्यांनी आंघोळ न करण्याचा पवित्रा घेतला असल्याचे ते सांगतात. पाण्याऐवजी अग्नी स्नान केल्याने शरीरातील सर्व जंतू आणि संसर्ग नष्ट होतात, असे कैलाश सिंह यांचे मत आहे.

कैलास अग्निस्नान करतात

कैलाश सिंहच्या म्हणण्यानुसार, देशावरील प्रेमापोटी ते आंघोळ करत नाही, तर शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, कैलास सिंह यांना सात मुली असल्याने मुलाच्या इच्छेने हे करत आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दररोज संध्याकाळी कैलास सिंह आग लावतात आणि एका पायावर उभे राहून गांजा पितात आणि भगवान शिवाची पूजा करतात.

वर्षभर दोन स्वेटर घाला, गरम पाणी प्या

कैलाश सिंग वर्षभर दोन स्वेटर घालतात आणि अग्नीस्नान करतात. तसेच, ते पिण्यासाठी फक्त गरम पाणी घेतात. भावाच्या मृत्यूनंतरही कैलास सिंह यांनी गंगेत स्नान करण्यास नकार दिला होता. कैलाश सिंह सांगतात की, त्यांनी 35 वर्षांपासून पाण्याने आंघोळ केलेली नाही. ते किराणा दुकान चालवत होते, पण त्यांच्या अशुद्ध सवयींमुळे त्यांच्या दुकानात ग्राहक येत नव्हते, त्यानंतर ते शेती करून जगत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIranइराणJara hatkeजरा हटके