शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा, 100 दिवसांत देणार 10 हजार नोकऱ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:49 PM

तरुणांना सरकारी नोकऱ्यांशी जोडून, त्यांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने गेल्या पाच वर्षांत 4.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.

राज्यातील तरुणांना 100 दिवसांत दहा हजार नोकऱ्या देण्यात येतील, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केली. राज्यातील सर्व निवड आयोग आणि मंडळांच्या अध्यक्षांसोबत आपल्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, एका सत्राशी संबंधित सर्व भरती परीक्षा त्याच सत्रात पूर्ण कराव्यात, असेही योगी यांनी म्हटले आहे.

तरुणांना सरकारी नोकऱ्यांशी जोडून, त्यांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने गेल्या पाच वर्षांत 4.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच, आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी, सर्व निवड आयोग आणि बोर्डांना 100 दिवस, सहा माहिने आणि वार्षिक लक्ष्य निर्धारित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, त्यांनी सर्व विभागांना वेळच्या-वेळीच मागण्या पाठविण्याचेही निर्देश दिले आहेत. 

भर्ती प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमांचे पालन व्हावे -भरती प्रक्रियेत आरक्षणाचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. भरतीच्या जाहिरातीत आरक्षणाचे नियम नमूद करावेत. भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी परीक्षा एजन्सी निवडताना आणि परीक्षा केंद्रांची निवड करताना विशेष काळजी घ्यावी. परीक्षा केंद्रे निश्चित करताना सरकारी शाळांना प्राधान्य द्यावे. परीक्षा केंद्र निवडताना जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी. 

परीक्षा केंद्र ठरवताना उमेदवारांची सोय लक्षात घेतली जावी. उमेदवारांची पडताळणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी. तसेच, पालीवाल समितीच्या शिफारशींनुसार भरती प्रक्रिया करण्यात यावी, असे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाEmployeeकर्मचारी