शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गो-तस्करी करणारी ट्रक घुसला घरात, 6 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 17:56 IST

नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली.

ठळक मुद्देअवैधरित्या जनावरांची केली जात होती तस्करीपोलीस करत होते ट्रकचा पाठलाग, ट्रक घुसला घरामध्येदुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू

लखनौ - नवीन वर्षाच्या पहाटेच उत्तर प्रदेशातील चंदौलीतील एका परिवारावर काळानं घाला घातला आहे. जिल्ह्यातील इलिया पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मालदह गावामध्ये रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये एक मिनी ट्रक घुसला आणि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये आणखी दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

(गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य)

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची तस्करी केली जात होती. जनावरं घेऊन जाणारा ट्रक बिहारच्या दिशेनं प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस या ट्रकचा पाठलाग करत होते. पोलिसांच्या भीतीपोटी चालक ट्रक भरधाव चालवत होता. यादरम्यान, चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याशेजारी असलेल्या झोपडीमध्ये ट्रक घुसला आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. 

(कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली १५ जनावरे जप्त)

साखरझोपेत असतानाच या सहा जणांवर काळानं घाला घातला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  या घटनेविरोधात स्थानिकांनी तीव्र संपात व्यक्त करत रास्तारोको आंदोलन केले. शिवाय, पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊ दिले नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी डीएम आणि एसपींनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणा आरोप केला आहे. याप्रकरणी सहाहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशcowगाय