शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ट्रक-बसची भीषण टक्कर होऊन लागली आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू, 21 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 07:59 IST

ट्रक आणि प्रवासी बस यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

कन्नौज (उत्तर प्रदेश)  - प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये घडला. अपघातग्रस्त बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मात्र वाटेत झालेल्या भीषण अपघातानंतर बसला आग लागली. अपघाताची तीव्रता आणि लागलेली आग इतकी भीषण होती की त्यामुळे बसमधून प्रवास करत असलेल्या अनेक प्रवाशांना बसमधून बाहेरही पडता आले नाही. 

हा अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडला. अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली. त्यामुळे बसमध्ये अडकलेले प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पूर्णपणे जळून गेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आता  डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवावी लागेल. त्यानंतरच मृतांचा आकडा समोर येऊ शकतो, असे कानपूरचे रेंजचे आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितले. 

अपघाताबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, ''अपघातग्रस्त बसमधून एकूण 43 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात 21 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी 26 प्रवासी हे गुरसहायगंज आणि 17 प्रवासी हे छिबरामऊ येथून प्रवास करत होते.'' 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच जखमींना प्रत्येकी  50 हजार आणि मृतांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश