शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 13:23 IST

देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली: देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दिल्ली काबीज करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे या राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह महाआघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यात काँग्रेसला यश आल्यास उत्तर प्रदेशातभाजपाला मोठा धक्का बसू शकतो, अशी आकडेवारी एबीपी माझा आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये मायावतींचा बसपा स्वतंत्र लढणार आहे. या राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला बसपासोबत आघाडी करण्यात यश आल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या हाताला बसपा आणि समाजवादी पक्षाची साथ मिळाल्यास भाजपाप्रणीत एनडीएच्या तब्बल 49 जागा घटतील. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपाने मित्रपक्षासह निवडणूक लढवत 80 पैकी तब्बल 73 जागा खिशात घातल्या होत्या. मात्र काँगेसला महाआघाडी करण्यात यश आल्यास भाजपा आणि मित्रपक्षांच्या जागा 24 वर येतील. तर महाआघाडीला 56 जागांवर यश मिळेल, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.

वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मायावतींनी या राज्यांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतही मायावतींनी हाच पवित्रा कायम राखल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँग्रेसला महाआघाडी करण्यात अपयश आल्यास भाजपाला मित्रपक्षांसह तब्बल 70 जागांवर यश मिळेल. तर काँग्रेसप्रणित युपीएला अवघ्या 2 जागा मिळतील आणि उर्वरित 8 जागांवर इतर पक्षांना यश मिळेल.

उत्तर प्रदेशात बुवा-बबुवा अर्थात मायावती आणि अखिलेश एकत्र आले तरीही काँग्रेस आणि भाजपाला धक्का बसू शकतो. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी आघाडी केल्यास त्यांना 42 जागांवर यश मिळू शकेल. या परिस्थितीत भाजपा आणि मित्रपक्षांना 36 जागांवर समाधान मानावं लागेल. यामुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँगेसप्रणित यूपीएला अवघ्या 2 जागा मिळतील. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती