शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 13:23 IST

देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली: देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दिल्ली काबीज करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे या राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह महाआघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यात काँग्रेसला यश आल्यास उत्तर प्रदेशातभाजपाला मोठा धक्का बसू शकतो, अशी आकडेवारी एबीपी माझा आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये मायावतींचा बसपा स्वतंत्र लढणार आहे. या राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला बसपासोबत आघाडी करण्यात यश आल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या हाताला बसपा आणि समाजवादी पक्षाची साथ मिळाल्यास भाजपाप्रणीत एनडीएच्या तब्बल 49 जागा घटतील. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपाने मित्रपक्षासह निवडणूक लढवत 80 पैकी तब्बल 73 जागा खिशात घातल्या होत्या. मात्र काँगेसला महाआघाडी करण्यात यश आल्यास भाजपा आणि मित्रपक्षांच्या जागा 24 वर येतील. तर महाआघाडीला 56 जागांवर यश मिळेल, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.

वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मायावतींनी या राज्यांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतही मायावतींनी हाच पवित्रा कायम राखल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँग्रेसला महाआघाडी करण्यात अपयश आल्यास भाजपाला मित्रपक्षांसह तब्बल 70 जागांवर यश मिळेल. तर काँग्रेसप्रणित युपीएला अवघ्या 2 जागा मिळतील आणि उर्वरित 8 जागांवर इतर पक्षांना यश मिळेल.

उत्तर प्रदेशात बुवा-बबुवा अर्थात मायावती आणि अखिलेश एकत्र आले तरीही काँग्रेस आणि भाजपाला धक्का बसू शकतो. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी आघाडी केल्यास त्यांना 42 जागांवर यश मिळू शकेल. या परिस्थितीत भाजपा आणि मित्रपक्षांना 36 जागांवर समाधान मानावं लागेल. यामुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँगेसप्रणित यूपीएला अवघ्या 2 जागा मिळतील. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती