शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 13:23 IST

देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली: देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दिल्ली काबीज करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे या राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह महाआघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यात काँग्रेसला यश आल्यास उत्तर प्रदेशातभाजपाला मोठा धक्का बसू शकतो, अशी आकडेवारी एबीपी माझा आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये मायावतींचा बसपा स्वतंत्र लढणार आहे. या राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला बसपासोबत आघाडी करण्यात यश आल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या हाताला बसपा आणि समाजवादी पक्षाची साथ मिळाल्यास भाजपाप्रणीत एनडीएच्या तब्बल 49 जागा घटतील. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपाने मित्रपक्षासह निवडणूक लढवत 80 पैकी तब्बल 73 जागा खिशात घातल्या होत्या. मात्र काँगेसला महाआघाडी करण्यात यश आल्यास भाजपा आणि मित्रपक्षांच्या जागा 24 वर येतील. तर महाआघाडीला 56 जागांवर यश मिळेल, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.

वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मायावतींनी या राज्यांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतही मायावतींनी हाच पवित्रा कायम राखल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँग्रेसला महाआघाडी करण्यात अपयश आल्यास भाजपाला मित्रपक्षांसह तब्बल 70 जागांवर यश मिळेल. तर काँग्रेसप्रणित युपीएला अवघ्या 2 जागा मिळतील आणि उर्वरित 8 जागांवर इतर पक्षांना यश मिळेल.

उत्तर प्रदेशात बुवा-बबुवा अर्थात मायावती आणि अखिलेश एकत्र आले तरीही काँग्रेस आणि भाजपाला धक्का बसू शकतो. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी आघाडी केल्यास त्यांना 42 जागांवर यश मिळू शकेल. या परिस्थितीत भाजपा आणि मित्रपक्षांना 36 जागांवर समाधान मानावं लागेल. यामुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँगेसप्रणित यूपीएला अवघ्या 2 जागा मिळतील. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती