शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

इराण –अमेरिका तणावामुळे भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:34 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इराण, ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली.

नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या मेजर जनरल कासीम सुलेमानी या लष्करी अधिकाऱ्याला ठार केले. या हल्लानंतर इराणने पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला  केला. त्यामुळे इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. 

या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इराण, ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी आखाती देशात वाढत्या संघर्षामुळे होत असलेल्या परिणामांची जाणीव करून देत तणावाची भारताला चिंता असल्याचे सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमधील जवाद जरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्विट केले आहे. 'इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली आहे. सध्याच्या घडामोडींनी गंभीर वळण घेतले आहे. भारत या तणावाच्या वातावरणामुळे चिंतित आहे. आम्ही संपर्कात राहू असे त्यांनी म्हटल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले. 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पिओ यांच्याशी चर्चा करून त्यांना भारताच्या अडचणींची जाणीव करून दिली. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीबाबत माइक पोम्पिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारताच्या हिताबाबत आणि काळजीच्या गोष्टींची माहिती त्यांना दिली. याचबरोबर, ओमानच्या मंत्र्यांसोबतही एस. जयशंकर यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी ट्विट केले की, आखाती देशात सुरु असलेल्या तणावावरून ओमानचे परराष्ट्र मंत्री यूसुफ अलावी यांच्याशी चर्चा केली. तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकी ड्रोन हल्ल्यात बगदादमध्ये जनरल सुलेमानी (६२) मारले गेले. त्याचा बदला घेण्याचा संकल्प इराणने केला आहे. यामुळे या दोन देशांत तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील ५२ ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल. यातील काही स्थळ इराण आणि इराणी संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIndiaभारत