शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

इराण –अमेरिका तणावामुळे भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:34 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इराण, ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली.

नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या मेजर जनरल कासीम सुलेमानी या लष्करी अधिकाऱ्याला ठार केले. या हल्लानंतर इराणने पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला  केला. त्यामुळे इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. 

या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इराण, ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी आखाती देशात वाढत्या संघर्षामुळे होत असलेल्या परिणामांची जाणीव करून देत तणावाची भारताला चिंता असल्याचे सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमधील जवाद जरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्विट केले आहे. 'इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली आहे. सध्याच्या घडामोडींनी गंभीर वळण घेतले आहे. भारत या तणावाच्या वातावरणामुळे चिंतित आहे. आम्ही संपर्कात राहू असे त्यांनी म्हटल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले. 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पिओ यांच्याशी चर्चा करून त्यांना भारताच्या अडचणींची जाणीव करून दिली. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीबाबत माइक पोम्पिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारताच्या हिताबाबत आणि काळजीच्या गोष्टींची माहिती त्यांना दिली. याचबरोबर, ओमानच्या मंत्र्यांसोबतही एस. जयशंकर यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी ट्विट केले की, आखाती देशात सुरु असलेल्या तणावावरून ओमानचे परराष्ट्र मंत्री यूसुफ अलावी यांच्याशी चर्चा केली. तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकी ड्रोन हल्ल्यात बगदादमध्ये जनरल सुलेमानी (६२) मारले गेले. त्याचा बदला घेण्याचा संकल्प इराणने केला आहे. यामुळे या दोन देशांत तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील ५२ ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल. यातील काही स्थळ इराण आणि इराणी संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIndiaभारत