शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 3:01 PM

बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देबिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे

नवी दिल्ली -  बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत काहीही काम झालेले नाही. बिहार जिखे होते तिथेच आजही आहे, अशी टीका कुशवाहा यांनी केली.'' कुशवाह हे मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळत होते. यावेळी एनडीएमध्ये होत असलेली आपली घुसमटही स्पष्टपणे बोलून दाखवली. ''एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारमधील जनतेला न्याय मिळावा यासाठी मी एनडीएच्या बैठकीत माझे मत वारंवार मांडले. मात्र नितीश कुमार बिहारी जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते.'' असे कुशवाह म्हणाले. तसेच राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे, तसेच हे काम भाजपाने सुरू केले आहे. असा आरोप कुशवाह यांनी केला.  

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे एनडीएला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षांच्या आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे आपला राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) हा पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दल या या पक्षाल विलीन करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुशवाहा यांच्या पक्षातील अनेक नेते जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी