शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:58 IST

बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ओव्हरटेकिंग करताना घडला असून कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने बिजनौर रोड अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. ऑटोमध्ये सात जण होते आणि या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना क्रेटा कारने टेम्पोला जोरदार धडक दिली.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोमध्ये प्रवास करणारे लोक मुरादाबाद रेल्वे स्थानकावरून धामापूरकडे येत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब घरी परतत होते. मृतांमध्ये ४ पुरुष, २ महिला आणि एका मुलीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता अपघातातील सर्व मृत झारखंडमधील एका लग्नातून घरी परतत होते. मृतांमध्ये खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल, सून खुशी याशिवाय मुमताज, पत्नी रुबी आणि मुलगी बुशरा यांचा समावेश आहे. हे कुटुंब झारखंडहून वधूसोबत परतत होतं. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू