शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

भारतीय लष्करासंदर्भात अपमानास्पद विधान प्रकरण, न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स; 24 मार्चल सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 01:14 IST

उदय शंकर श्रीवास्तव यांच्या मते, राहुल गांधी यांनी भारतीय सैनिकांची खिल्ली उडवत बदनामी केली. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 24 मार्चसाठी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील एका न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद विधानासंदर्भात लखनौ न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.

राहुल गांधी यांना ही नोटीस लखनौच्या एमपी एमएलए न्यायालयाने बजावली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (BRO) माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. १६ डिसेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी भारतीय सैन्यासंदर्भात भाष्य केल्याचा आरोप आहे.

असं आहे संपूर्ण प्रकरण -तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पत्रकारांसोबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, "9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांना मारहाण झाली, त्यासंदर्भात कुणीही काहीही विचारत नही?" यानंतर, 12 डिसेंबर 2022 रोजी भारतीय सेनिकांनी राहुल गांधी यांच्या या विधानाचे खंडन केले होते. सेन्याने अधिकृत निवेदन दिले होते की, "अरुणाचल प्रदेशात चिनी सेनिकांनी अवैधरित्या घुसखोरी केली होती. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आणि चिनी सैनिक परत निघून गेले."

उदय शंकर श्रीवास्तव यांच्या मते, राहुल गांधी यांनी भारतीय सैनिकांची खिल्ली उडवत बदनामी केली. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 24 मार्चसाठी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे.

राहुल गांधीच्या विधानाने निर्माण झाला होता वाद - त्यावेळी अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या या विधानासाठी देशद्रोही म्हटले होते, तर विरोधकांनी याला राहुल गांधींविरोधातील षड्यंत्र, म्हटले होते. महत्वाचे म्हणजे चीनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते सातत्याने सरकारवर हल्ला करताना दिसतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयcongressकाँग्रेसSoldierसैनिक