शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
4
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
5
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
6
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
8
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
9
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
10
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
11
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
12
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
13
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
14
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
15
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
16
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
17
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
18
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
19
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?

'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 14:06 IST

हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे प्रतिष्ठेमुळे भारतालाही गौरव मिळेल.

RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे आणि म्हटले आहे की भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहे. जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल, तेव्हाच भारतालाही वैभव मिळेल.

आरएसएसचे मुखपत्र 'ऑर्गनायझर वीकली' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भागवत यांनी शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही. संघ जगभरातील हिंदूंसाठी शक्य ते सर्व करेल. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतात.

हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे प्रतिष्ठेमुळे भारतालाही गौरव मिळेल. जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत, एकेकाळी ते देखील हिंदू होते. त्यांना सोबत घेऊन जाण्याचे उदाहरण केवळ एक मजबूत हिंदू समाजच ठेवू शकतो. जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला, तर स्वाभाविकपणे जगभरातील हिंदूंनाही बळ मिळेल. हे काम चालू आहे, पण अद्याप पूर्ण झालेले नाही. हळूहळू पण निश्चितच ही परिस्थिती विकसित होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

भागवत पुढे म्हणतात, बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध यावेळी जो संताप व्यक्त झाला आहे, तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. आता तिथले हिंदू म्हणत आहेत - 'आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू.' हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे आणि संघटनेच्या विस्तारामुळे ही ताकद आणखी व्यापक होईल. हे ध्येय पूर्णपणे साध्य होईपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतHinduहिंदू