शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Unlock 2: बेफिकिरी वाढल्याने पंतप्रधानांना चिंता; स्थानिक प्रशासनांनी कठोर कारवाई करावी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 1:58 AM

कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी केलेले नियम व लागू केलेले निर्बंध हे देशातील १३० कोटी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हाती घेतलेले अभियान आहे

नवी दिल्ली : देशात ‘लॉकडाऊन’ लागू असताना लोक नियमांचे जेवढ्या प्रामाणिकपणे पालन करीत होते तेवढे ते आता करताना दिसत नाहीत. देशात आता ‘अनलॉक-२’चा टप्पा सुरू असताना लोक वाढत्या बेफिकिरीने वागताना दिसतात. खरे तर जेव्हा अधिक सावध राहायला हवे तेव्हा अशी बेफिकिरी ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना फटकारले.

टीव्हीवरून केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी केलेले नियम व लागू केलेले निर्बंध हे देशातील १३० कोटी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हाती घेतलेले अभियान आहे. त्यामुळे गावाचा सरपंच असो वा देशाचा पंतप्रधान, सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे व वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे अशा नियमांचे कसोशीने करावेच लागेल.भारतातील परिस्थिती आटोक्यात

  • जे नियमांचे पालन करीत नाहीत त्यांना आपल्याला सांगावे लागेल, थांबवावे लागेल व समजावून सांगावे लागेल, असे सांगून मोदींनी विदेशात एका देशाच्या पंतप्रधानाला मास्क वापरला नाही म्हणून १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा दाखला दिला.
  • नियमांची प्रत्यक्ष जागेवर अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक प्रशासनांनीही अशीच तत्परता दाखवायला हवी, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
  • कोरोनाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात असताना बेपर्वाई व शिथिलता दाखविणे मारक ठरेल, असा इशारा देत मोदी म्हणाले की, कोरोनाच्या मृत्यूंचे प्रमाण पाहिले तर इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती बरीच आटोक्यात असल्याचे दिसते.
  • योग्यवेळी ‘लॉकडाऊन’ लागू केल्याने व लोकांनी त्याचे काटेकोर पालन केल्यानेच हे शक्य झाले; पण आता ‘अनलॉक’च्या काळात जेव्हा पूर्वीपेक्षा अधिक सावध राहण्याची गरज आहे तेव्हा व्यक्तिगत तसेच सामुदायिक पातळीवरही बेफिकिरी वाढतच असल्याचे दिसते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी