शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:40 IST

विधेयकाचा विरोध करत विरोधी पक्षातील काही खासदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करत होते.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ३ महत्त्वाचे विधेयक सादर केले. त्यात गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग ३० दिवस जेलमध्ये राहणाऱ्या पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अथवा राज्य आणि केंद्र शासित राज्यातील कुणीही मंत्री यांना हटवण्याबाबत एक विधेयक सादर केले. हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडताच विरोधकांनी मोठा गोंधळ केला. या विधेयकावर विरोधकांनी गोंधळ घातला. 

अमित शाहांच्या दिशेने कागद भिरकावले

विधेयकाचा विरोध करत विरोधी पक्षातील काही खासदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी आक्रमक खासदारांनी विधेयकाची कॉपी फाडली आणि कागदाचे तुकडे अमित शाहांच्या दिशेने भिरकावले. शाह यांनी त्यांच्या भाषणात हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र विरोधकांनी विधेयकाचा कडाडून विरोध केला. 

संविधानाच्या १३० व्या दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडल्यानंतर विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होती. विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. वेलमध्ये उतरलेल्या खासदारांनी गृह मंत्री शाह यांचा माइकही मोडण्याचा प्रयत्न केला. सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे खासदारही गृह मंत्री शाह यांच्या समर्थनार्थ पुढे आणि विरोधी पक्षातील खासदारांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले. रवनीत बिट्टू, कमलेश पासवान, किरेन रिजिजू, सतीश गौतम यांनी गृहमंत्री शाह यांच्याजवळ येणाऱ्या आक्रमक खासदारांना रोखले. टीएमसीच्या खासदारांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला. त्यानंतर काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी त्यांच्या जागेवरूनच विधेयकाची कॉपी फाडली. त्यानंतर काँग्रेस खासदार वेलमध्ये उतरले. 

"जेलमध्ये गेल्यावर मी दिला होता राजीनामा..." 

अमित शाह यांनी विधेयक मांडताना काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांच्यावर टीका केली. मी एका खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलो होतो तेव्हा नैतिकतेच्या आधारे मी पदाचा राजीनामा दिला होता असं शाह यांनी म्हटलं. जोपर्यंत कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केले नाही तोवर कुठलेही संविधानिक पद मी स्वीकारले नाही. आम्ही इतके निर्लज्ज नाही की आमच्यावर आरोप होऊन आम्ही पदावर कायम राहू. विरोधी पक्षाने आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नयेत. नैतिकतेचे मूल्य वाढले पाहिजे असं अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 

दरम्यान, शाह यांनी विधेयक सादर करताना ते २१ सदस्यांच्या जेपीसीकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर आवाजी मतदान घेण्यात आले तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. परंतु प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर होऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजकारणात नैतिकता गरजेची आहे असं सांगत हे विधेयक जेपीसीकडे चर्चेसाठी पाठवले आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा