शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 08:38 IST

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार हा जातीय संघर्ष असून त्याचा दहशतवाद किंवा धर्माशी संबंध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

HM Amit Shah on Manipur Voilence : मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या घटना सुरुच असून आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न देखील केला जात आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना मणिपूरमध्ये हिंसाचार न थांबवण्याचे कारण सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामागील अडचणींवर भाष्य केलं आहे.

मणिपूरमध्ये गेल्या १९ महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून आणि हा हिंसाचार कधी संपणार याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती नाही. अशातच शनिवारी ककचिंग जिल्ह्यात दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर येथील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. मणिपूरमधल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ३ मे २०२३ पासून या ईशान्येकडील राज्यात हिंसाचार सुरू आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये मणिपूरमधील परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अमित शाह यांनी भाष्य केलं. "मी हे निमित्त म्हणून सांगत नाही, तर पार्श्वभूमीबद्दल बोलत ​​आहे. मणिपूरमध्ये जेव्हा-जेव्हा वांशिक हिंसाचार झाला, तेव्हा तो दीड वर्ष चालू राहिला. अनेक वेळा हिंसाचार तीन वर्षांपर्यंत चालला असून त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. जातीय हिंसाचारामुळे हे घडले. मात्र, आता हिंसाचार बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे या लोकांनाही संसदेत गदारोळ करून भडकावायचा आहे. पण मला विश्वास आहे की आता परिस्थिती ठीक होईल," असं अमित शाह म्हणाले.

दरम्यान, मणिपूर दीड वर्षांहून अधिक काळ धुमसत आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या संघर्षात ३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. इम्फाळ खोऱ्यात राहणारा मेईतेई समाज आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागात राहणारा कुकी समाज यांच्यात हा तणाव आहे. बहुसंख्य मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात गेल्या वर्षी एकता मोर्चा काढल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार आजही कायम आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद