शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 08:38 IST

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार हा जातीय संघर्ष असून त्याचा दहशतवाद किंवा धर्माशी संबंध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

HM Amit Shah on Manipur Voilence : मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचाराच्या घटना सुरुच असून आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न देखील केला जात आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना मणिपूरमध्ये हिंसाचार न थांबवण्याचे कारण सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामागील अडचणींवर भाष्य केलं आहे.

मणिपूरमध्ये गेल्या १९ महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून आणि हा हिंसाचार कधी संपणार याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती नाही. अशातच शनिवारी ककचिंग जिल्ह्यात दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर येथील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. मणिपूरमधल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ३ मे २०२३ पासून या ईशान्येकडील राज्यात हिंसाचार सुरू आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये मणिपूरमधील परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अमित शाह यांनी भाष्य केलं. "मी हे निमित्त म्हणून सांगत नाही, तर पार्श्वभूमीबद्दल बोलत ​​आहे. मणिपूरमध्ये जेव्हा-जेव्हा वांशिक हिंसाचार झाला, तेव्हा तो दीड वर्ष चालू राहिला. अनेक वेळा हिंसाचार तीन वर्षांपर्यंत चालला असून त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. जातीय हिंसाचारामुळे हे घडले. मात्र, आता हिंसाचार बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे या लोकांनाही संसदेत गदारोळ करून भडकावायचा आहे. पण मला विश्वास आहे की आता परिस्थिती ठीक होईल," असं अमित शाह म्हणाले.

दरम्यान, मणिपूर दीड वर्षांहून अधिक काळ धुमसत आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या संघर्षात ३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. इम्फाळ खोऱ्यात राहणारा मेईतेई समाज आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागात राहणारा कुकी समाज यांच्यात हा तणाव आहे. बहुसंख्य मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात गेल्या वर्षी एकता मोर्चा काढल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार आजही कायम आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद